शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची वीज तोडल्यास आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST

पत्रकात म्हटले आहे की, गत अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल ५० टक्के माफ करणे व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार नाही, ...

पत्रकात म्हटले आहे की, गत अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल ५० टक्के माफ करणे व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार नाही, अशा घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या. मात्र, अधिवेशन संपताना डॉ. नितीन राऊत यांनी वीज बिल वसुली करणारच आणि त्यासाठी वीज जोडणी तोडणार, अशी घोषणा केली. सध्या महाराष्ट्रात उन्हाळा जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून, घाम गाळून पिके चांगली आणली आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांना दिलेली अनेक वर्षांतील बिले चुकीची आकारणी करून दिली आहेत. शेतकऱ्याला पुरेशा दाबाने दिवसा वीज दिली जात नाही. वेळेवर ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होत नाही. यापूर्वी बिले भरूनही शेतकऱ्यांना अनेक आठवडे दुरुस्तीअभावी वीज मिळत नव्हती. आताही मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी विजेचे बिल सरकारला देणे लागत नाही.

वास्तविक पाहता सध्याच्या सरकारने व पूर्वीच्या २००४-२००५ च्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने वीज बिल पूर्ण माफ करण्याची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या घोषणेचे पालन केलेले नाही. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर नाही. शेती तोट्यात आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सर्व पायाभूत सुविधा पाणी, वीज, रस्ते मोफत मिळाले पाहिजेत. सध्याच्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांबाबत योग्य भूमिका घेतलेली नाही. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात गेली अनेक महिने आंदोलन चालू आहे. मात्र, सरकार दाद देत नाही. एकूणच शेतकरी संभ्रमात आहेत.

राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र विचार करून वीज बिल पूर्ण माफ होण्यासाठी सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला पाहिजे. सर्व शेतकरी आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होतील. शेतकऱ्यांना एका बाजूला अन्नदाता म्हणायचे. त्याने कोरोना काळात चांगले काम केले म्हणायचे. भाषणात उल्लेख करायचा; पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पोटावर पाय द्यायचा, असेही पत्रकात म्हटले आहे.