शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

शेतकऱ्यांची वीज तोडल्यास आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST

पत्रकात म्हटले आहे की, गत अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल ५० टक्के माफ करणे व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार नाही, ...

पत्रकात म्हटले आहे की, गत अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल ५० टक्के माफ करणे व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार नाही, अशा घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या. मात्र, अधिवेशन संपताना डॉ. नितीन राऊत यांनी वीज बिल वसुली करणारच आणि त्यासाठी वीज जोडणी तोडणार, अशी घोषणा केली. सध्या महाराष्ट्रात उन्हाळा जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून, घाम गाळून पिके चांगली आणली आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांना दिलेली अनेक वर्षांतील बिले चुकीची आकारणी करून दिली आहेत. शेतकऱ्याला पुरेशा दाबाने दिवसा वीज दिली जात नाही. वेळेवर ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होत नाही. यापूर्वी बिले भरूनही शेतकऱ्यांना अनेक आठवडे दुरुस्तीअभावी वीज मिळत नव्हती. आताही मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी विजेचे बिल सरकारला देणे लागत नाही.

वास्तविक पाहता सध्याच्या सरकारने व पूर्वीच्या २००४-२००५ च्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने वीज बिल पूर्ण माफ करण्याची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या घोषणेचे पालन केलेले नाही. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर नाही. शेती तोट्यात आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सर्व पायाभूत सुविधा पाणी, वीज, रस्ते मोफत मिळाले पाहिजेत. सध्याच्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांबाबत योग्य भूमिका घेतलेली नाही. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात गेली अनेक महिने आंदोलन चालू आहे. मात्र, सरकार दाद देत नाही. एकूणच शेतकरी संभ्रमात आहेत.

राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र विचार करून वीज बिल पूर्ण माफ होण्यासाठी सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला पाहिजे. सर्व शेतकरी आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होतील. शेतकऱ्यांना एका बाजूला अन्नदाता म्हणायचे. त्याने कोरोना काळात चांगले काम केले म्हणायचे. भाषणात उल्लेख करायचा; पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पोटावर पाय द्यायचा, असेही पत्रकात म्हटले आहे.