शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी ‘लाली लाल’

By admin | Updated: August 27, 2015 23:05 IST

खंडाळा तालुक्यात दुहेरी संकट : भांडवल निघणेही मुश्किल

खंडाळा : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली ओढ त्यामुळे शेतीपाण्याचा गंभीर बनत चाललेला प्रश्न आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडलेले दर यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक बळ देणारं खरीप हंगामातील पीक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते; परंतु यावर्षी टोमॅटोचे दर एवढे ढासळले की, पिकाचे घातलेले भांडवलही निघणे मुश्किल बनले आहे.जून महिन्यापासून येणारा मोसमी पाऊस आलाच नाही, पावसाने चांगलीच ओढ दिली. आता परतीच्या मान्सूनचाही तपास नाही. त्यामुळे चहू बाजूच्या विहिरी, तलाव आटू लागले आहेत. खरीप हंगामातील बहुतांशी पिकांची पेरणी झाली खरी; पिकांनी डोके वर काढण्याअगोदरच ती कोमेजली आहेत.खंडाळा तालुक्यातील बागायती पट्ट्यात विहिरींच्या पाण्यावर टोमॅटो, भेंडीसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात; परंतु यावर्षी टोमॅटोचे भाव पुरते ढासळले आहेत. प्रतिकिलो सरासरी पाच रुपये सुद्धा दर मिळेनासा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले टोमॅटोचे फड अर्ध्यावरच सोडून दिले आहेत. पाऊसही नाही आणि दरही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका, अशी झाली आहे. टोमॅटोच्या पिकासाठी लागवडीपासून ते फळधारणेपर्यंत हजारो रुपये खर्च करावे लागतात. एवढं करूनही खराब हवामान आणि कमी झालेले दर अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकला आहे.याशिवाय तालुक्यातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, भात, मका, वाटाणा, तूर, उडीद, मूग या पिकांचीही अवस्था दयनीय आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतकरी चिंतातूर दिसत आहे. (प्रतिनिधी)भेंडी व टोमॅटोला प्रतिवर्षी चांगला दर मिळतो; पण यावर्षी पाऊस नसल्याने टोमॅटोला दर नाही. ज्यावर्षी पाऊस जास्त त्यावर्षी दर अधिक अशी साधारण स्थिती असते. शेतकऱ्यांनी फड सोडून दिल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - किसनराव ननावरे, आडतदार दरवर्षी टोमॅटो पीक आम्ही घेतो. सरासरी १५ ते २० रुपये बाजारात दर मिळतो. त्यामुळे चांगले पैसे होतात; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे पाण्याची कमतरता आणि ढासळलेला दर यामुळे पूर्ण नुकसान झाले आहे. भांडवलाच्या खर्चाचे कर्ज डोईजड झाले आहे ते फेडण्यासाठी मार्गच उरला नाही.- संपतराव नेवसे, शेतकरी