शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी ‘लाली लाल’

By admin | Updated: August 27, 2015 23:05 IST

खंडाळा तालुक्यात दुहेरी संकट : भांडवल निघणेही मुश्किल

खंडाळा : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली ओढ त्यामुळे शेतीपाण्याचा गंभीर बनत चाललेला प्रश्न आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडलेले दर यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक बळ देणारं खरीप हंगामातील पीक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते; परंतु यावर्षी टोमॅटोचे दर एवढे ढासळले की, पिकाचे घातलेले भांडवलही निघणे मुश्किल बनले आहे.जून महिन्यापासून येणारा मोसमी पाऊस आलाच नाही, पावसाने चांगलीच ओढ दिली. आता परतीच्या मान्सूनचाही तपास नाही. त्यामुळे चहू बाजूच्या विहिरी, तलाव आटू लागले आहेत. खरीप हंगामातील बहुतांशी पिकांची पेरणी झाली खरी; पिकांनी डोके वर काढण्याअगोदरच ती कोमेजली आहेत.खंडाळा तालुक्यातील बागायती पट्ट्यात विहिरींच्या पाण्यावर टोमॅटो, भेंडीसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात; परंतु यावर्षी टोमॅटोचे भाव पुरते ढासळले आहेत. प्रतिकिलो सरासरी पाच रुपये सुद्धा दर मिळेनासा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले टोमॅटोचे फड अर्ध्यावरच सोडून दिले आहेत. पाऊसही नाही आणि दरही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका, अशी झाली आहे. टोमॅटोच्या पिकासाठी लागवडीपासून ते फळधारणेपर्यंत हजारो रुपये खर्च करावे लागतात. एवढं करूनही खराब हवामान आणि कमी झालेले दर अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकला आहे.याशिवाय तालुक्यातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, भात, मका, वाटाणा, तूर, उडीद, मूग या पिकांचीही अवस्था दयनीय आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतकरी चिंतातूर दिसत आहे. (प्रतिनिधी)भेंडी व टोमॅटोला प्रतिवर्षी चांगला दर मिळतो; पण यावर्षी पाऊस नसल्याने टोमॅटोला दर नाही. ज्यावर्षी पाऊस जास्त त्यावर्षी दर अधिक अशी साधारण स्थिती असते. शेतकऱ्यांनी फड सोडून दिल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - किसनराव ननावरे, आडतदार दरवर्षी टोमॅटो पीक आम्ही घेतो. सरासरी १५ ते २० रुपये बाजारात दर मिळतो. त्यामुळे चांगले पैसे होतात; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे पाण्याची कमतरता आणि ढासळलेला दर यामुळे पूर्ण नुकसान झाले आहे. भांडवलाच्या खर्चाचे कर्ज डोईजड झाले आहे ते फेडण्यासाठी मार्गच उरला नाही.- संपतराव नेवसे, शेतकरी