शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

किडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे चेहरे सुकले

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

दुबार पेरणीचे संकट : दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिके वाळणार

किडगाव : सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. तर पश्चिमेकडील तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे सुकले आहेत.पावसाने ओढ दिल्याने किडगाव, ता. सातारा परिसरातील नेले, वर्ये, धावडशी, पिंपळवाडी, कण्हेर, वेळेकामथी येथील पेरणी झालेली पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सोयाबीन, भुईमूग, कडधान्य या पिकांची पेरणी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी केली गेली होती; मात्र पेरणी झाल्यापासून एकदाही पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. दोन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार परेणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे आहे.पिकांना पाणी द्यावे तर कण्हेर धरणाच्या कालव्याचे पाणी व्यवस्थापनाने बंद केले आहे. कण्हेर धरणात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने कॅनॉलला पाणी सोडता येत नाही. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. त्यामुळे पेरणी झालेली पिके येणाऱ्या पावसाची वाट पाहत आहेत. या भागात नेहमी चांगला पाऊस होत असतो. यावर्षी उसाची लागवड ही शेतकऱ्यांनी केली असून, शेतकऱ्यांबरोबर चातक पक्ष्याचाही घसा कोरडा पडला आहे. (वार्ताहर)नदीपात्र अजूनही कोरडेचजुलै महिना उजाडला तरीही पावसाने ओढ दिल्याने नदीपात्र आणि ओढे अजूनही कोरडेच पडले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. भुरभुरणाऱ्या पावसापेक्षा आता सर्वांनाच प्रतिक्षा धो धो पडणाऱ्या पावसाची आहे.शेतकऱ्यांचे नुकसानच१९७२ नंतर एवढा मोठा दुष्काळ या भागाने प्रथमच अनुभवला आहे. चातकाबरोबर शेतकऱ्यांनाही ‘ये रे ये रे पावसा..’ म्हणण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके वाळून जाणार. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. - सयाजी इंगवले, प्रगतशील शेतकरी