शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

किडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे चेहरे सुकले

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

दुबार पेरणीचे संकट : दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिके वाळणार

किडगाव : सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. तर पश्चिमेकडील तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे सुकले आहेत.पावसाने ओढ दिल्याने किडगाव, ता. सातारा परिसरातील नेले, वर्ये, धावडशी, पिंपळवाडी, कण्हेर, वेळेकामथी येथील पेरणी झालेली पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सोयाबीन, भुईमूग, कडधान्य या पिकांची पेरणी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी केली गेली होती; मात्र पेरणी झाल्यापासून एकदाही पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. दोन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार परेणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे आहे.पिकांना पाणी द्यावे तर कण्हेर धरणाच्या कालव्याचे पाणी व्यवस्थापनाने बंद केले आहे. कण्हेर धरणात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने कॅनॉलला पाणी सोडता येत नाही. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. त्यामुळे पेरणी झालेली पिके येणाऱ्या पावसाची वाट पाहत आहेत. या भागात नेहमी चांगला पाऊस होत असतो. यावर्षी उसाची लागवड ही शेतकऱ्यांनी केली असून, शेतकऱ्यांबरोबर चातक पक्ष्याचाही घसा कोरडा पडला आहे. (वार्ताहर)नदीपात्र अजूनही कोरडेचजुलै महिना उजाडला तरीही पावसाने ओढ दिल्याने नदीपात्र आणि ओढे अजूनही कोरडेच पडले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. भुरभुरणाऱ्या पावसापेक्षा आता सर्वांनाच प्रतिक्षा धो धो पडणाऱ्या पावसाची आहे.शेतकऱ्यांचे नुकसानच१९७२ नंतर एवढा मोठा दुष्काळ या भागाने प्रथमच अनुभवला आहे. चातकाबरोबर शेतकऱ्यांनाही ‘ये रे ये रे पावसा..’ म्हणण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके वाळून जाणार. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. - सयाजी इंगवले, प्रगतशील शेतकरी