शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

शेतकºयांनीच अडविले अखेर माणगंगेचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:58 IST

नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे काही शेतकरीच स्वत:हून फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न ...

नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे काही शेतकरीच स्वत:हून फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.महाराष्ट्रात २००२-२००३ साली भयानक दुष्काळ पडला होता. जनावरांना छावण्या, लोकांना पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे सुरू होती. त्यावेळी लोकांना आधार देण्यासाठी परिस्थिती पाहण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माणचा दौरा केला होता व पुढे कराड येथील सभेत माण-खटावसाठी तातडीचा निधी म्हणून १० कोटी रुपये मंजूर केले. या निधीतून खटावमधील येरळा व माणमधील माणगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले गेले. ही कल्पना चांगली वाटली, यातून काही प्रमाणांत नदीकाठच्या शेती पाण्याचा प्रश्न मिटेल, म्हणून पुढे दिवंगत सदाशिवराव पोळ, आमदार जयकुमार गोरे, पंकजा मुंढे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून आणखी बंधारे उभे राहिले.यापैकी पळशी व गोंदवले बंधाºयात पाणी चांगल्या पद्धतीने अडले गेले. मात्र, दहिवडी हद्दीतील पाचही बंधाºयांची अवस्था बिकट होत गेली. या ठिकाणी अनेक बंधारे लिकेज राहिले, खरेतर पाटबंधारे खात्याने ते हस्तांतरित करताना लिकेज पाहूनच ताबा घ्यायला हवा होता, पण त्यावेळी लिकेज न पाहताच ताबा घेण्यात आला.पुढे पाणी न साचताच या योजनेवर लिकेज काढण्यासाठी निधी खर्च करावा लागला. आता लिकेज निघाले आहे पण पाणी अडवले गेले नाही. हा प्रशासनाचा गलथान कारभार पाहून शेतकरी त्रस्त झाले आहेत.याच नदीवर पळशी, गोंदवले येथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले आहे. मात्र, दहिवडीतील पाचही बंधाºयांत फळ्या टाकण्याऐवजी ज्या होत्या त्या काढण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे दहिवडी परिसरात चांगला पाऊस पडूनही लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. १५ सप्टेंबरपूर्वी पाणी अडवले जाते. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही, उलट फळ्या काढण्यासाठी अधिकारी आले असता त्यांना नागरिकांनी विरोध केला.अनेकवेळा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बंधाºयाचा उपयोग व्हावा, यासाठी शेतकºयाने लोकवर्गणी काढून दुरुस्ती केली, आता पाणी अडले गेले नाही तर पुन्हा दहिवडी परिसरातील नदीकाठच्या शेतकºयांना पाण्याची समस्या भेडसावणार आहे.२५ तारखेपासून फळ्या काढणारसंबधित अधिकारी सहायक अभियंता उत्तम धायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पावसाळी वातावरण असल्यामुळे अधिकारी फळ्या काढण्यास गेले होते. २० तारखेला फळ्या टाकण्याची निविदा निघणार असून, २५ तारखेपर्यंत सर्व पाणी अडविले जाईल.