शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनीच अडविले अखेर माणगंगेचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:58 IST

नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे काही शेतकरीच स्वत:हून फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न ...

नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे काही शेतकरीच स्वत:हून फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.महाराष्ट्रात २००२-२००३ साली भयानक दुष्काळ पडला होता. जनावरांना छावण्या, लोकांना पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे सुरू होती. त्यावेळी लोकांना आधार देण्यासाठी परिस्थिती पाहण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माणचा दौरा केला होता व पुढे कराड येथील सभेत माण-खटावसाठी तातडीचा निधी म्हणून १० कोटी रुपये मंजूर केले. या निधीतून खटावमधील येरळा व माणमधील माणगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले गेले. ही कल्पना चांगली वाटली, यातून काही प्रमाणांत नदीकाठच्या शेती पाण्याचा प्रश्न मिटेल, म्हणून पुढे दिवंगत सदाशिवराव पोळ, आमदार जयकुमार गोरे, पंकजा मुंढे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून आणखी बंधारे उभे राहिले.यापैकी पळशी व गोंदवले बंधाºयात पाणी चांगल्या पद्धतीने अडले गेले. मात्र, दहिवडी हद्दीतील पाचही बंधाºयांची अवस्था बिकट होत गेली. या ठिकाणी अनेक बंधारे लिकेज राहिले, खरेतर पाटबंधारे खात्याने ते हस्तांतरित करताना लिकेज पाहूनच ताबा घ्यायला हवा होता, पण त्यावेळी लिकेज न पाहताच ताबा घेण्यात आला.पुढे पाणी न साचताच या योजनेवर लिकेज काढण्यासाठी निधी खर्च करावा लागला. आता लिकेज निघाले आहे पण पाणी अडवले गेले नाही. हा प्रशासनाचा गलथान कारभार पाहून शेतकरी त्रस्त झाले आहेत.याच नदीवर पळशी, गोंदवले येथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले आहे. मात्र, दहिवडीतील पाचही बंधाºयांत फळ्या टाकण्याऐवजी ज्या होत्या त्या काढण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे दहिवडी परिसरात चांगला पाऊस पडूनही लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. १५ सप्टेंबरपूर्वी पाणी अडवले जाते. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही, उलट फळ्या काढण्यासाठी अधिकारी आले असता त्यांना नागरिकांनी विरोध केला.अनेकवेळा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बंधाºयाचा उपयोग व्हावा, यासाठी शेतकºयाने लोकवर्गणी काढून दुरुस्ती केली, आता पाणी अडले गेले नाही तर पुन्हा दहिवडी परिसरातील नदीकाठच्या शेतकºयांना पाण्याची समस्या भेडसावणार आहे.२५ तारखेपासून फळ्या काढणारसंबधित अधिकारी सहायक अभियंता उत्तम धायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पावसाळी वातावरण असल्यामुळे अधिकारी फळ्या काढण्यास गेले होते. २० तारखेला फळ्या टाकण्याची निविदा निघणार असून, २५ तारखेपर्यंत सर्व पाणी अडविले जाईल.