शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

भाजप सत्तेत राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त..

By admin | Updated: March 13, 2017 22:56 IST

पृथ्वीराज चव्हाण : आर्वी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा; विजयी सदस्यांचा सत्कार सोहळा

रहिमतपूर : ‘निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केलं म्हणून त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेणारे हे सरकार उद्योगपती व बिल्डरधार्जिणे आहे. या सरकारला असेच सत्तेत ठेवल्यास शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. आर्वी, ता. कोरेगाव येथे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका व नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा विजयी सत्कार सोहळा व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, आमदार जयकुमार गोरे, आ. मोहनराव कदम, धैर्यशील कदम, कोरेगाव तालुकाध्यक्ष किशोर बाचल, कऱ्हाड मार्केट कमिटीचे सभापती हिंदुराव चव्हाण, किरण बर्गे, संपतराव माने, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील आदी उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘सरकारला ग्रामीण अर्थव्यवस्था समजलेली नाही. शेतीमालाला किफायतशीर दर दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होणार नाही. काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांची ७२ हजार कोटींची कर्ज माफ केली होती. महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. भाजप सरकारला कर्ज माफ करायला काय अडचण आहे. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. काँग्रेसच्या वेगवेगळ्या योजना नाव बदलून राबवूनही दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आले आहे.’भीमराव पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘वाठार किरोली गटातील जनतेने निवडणूक हातात घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे यांनी दिलेला निधी मतदार संघात खर्च केला आहे. त्यामुळे जनतेची साथ मिळाली. कुणी काहीही म्हणाले तरी नेहमी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. रहिमतपूरमधील ज्येष्ठ नेते पक्षाला ताप देत असून, त्याच्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा.’पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, निवास थोरात, सुनीता कदम आदी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी धैर्यशील कदम, प्रकाश पाटील, विकास राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. दीपक साबळे यांनी सूचसंचालन केले. विकास राऊत यांनी आभार मानले. (वार्ताहर) सत्तेचा होतोय दुरुपयोग...निवडणुकीमध्ये तत्व, त्याग, धोरण व विकासाचा काहीही संबंध न ठेवता भाजपा सरकारने फक्त सत्ता व संपत्तीचा प्रचंड मोठा दुरुपयोग करून कसल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच असे धोरण राबवले. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्या. नाहीतर आपली लढाई राष्ट्रवादीबरोबर आहे. सत्ताधाऱ्यांनी आपले उमेदवार व कार्यकर्ते फोडण्यासाठी आमिषे दाखवली. आमिषाला बळी नाही पडली त्यांना आमच्याकडे या नाहीतर तुमच्या केस बाहेर काढून चौकशी लावू, अशा धमक्या दिल्या. असा सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही : गोरेआमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला वातावरण चांगले होते. मात्र, मतदानाच्या अगोदर तीन दिवसांत गणित फिरले नाहीतर जिल्हा परिषदेला २०-२२ सदस्य काँग्रेसचे असते. पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसचा पराभव कुणीही करू शकत नाही. परंतु गद्दारी करणाऱ्यांमुळे पराभव होत असून, हे थांबले पाहिजे. बाबा तुम्ही याबाबत लवकर निर्णय घ्या. पक्षाबरोबर राहणाऱ्यांना नीटनेटके करा. पक्षवाढीसाठी जिल्हाभर पळतो म्हणून मला वेगवेगळ्या प्रकरणात अडवले जातेय; पण राजकारणात येतानाच मी सर्व सामग्री घेऊन आलोय. त्यामुळे ‘सर्वांना पुरुन उरुन यांना गाडल्याशिवाय मी थांबणार नाय,’ असा टोलाही आ. गोरे यांनी हाणला.