शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहनपर मदतीपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:11 IST

एक वर्ष होऊनही नियमित शेतकऱ्यांच्या हाती अजून काहीच पडले नाही. त्यामुळे आपल्या तोंडाला या सरकारने पाने पुसल्याची भावना ग्रामीण ...

एक वर्ष होऊनही नियमित शेतकऱ्यांच्या हाती अजून काहीच पडले नाही. त्यामुळे आपल्या तोंडाला या सरकारने पाने पुसल्याची भावना ग्रामीण शेतकऱ्यांची बनली आहे. राज्यात सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करीत महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. दोन लाखांपर्यंत थकीत कृषी कर्ज माफ करण्यात आले. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला. मात्र, यामुळे नियमित कर्ज भरून आपण चूक केली, अशी भावना नियमित खातेदारांत निर्माण होऊ नये म्हणून या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. या घोषणेला वर्ष उलटून गेले तरी मूर्तरूप आलेले नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीही जमा झाले नाही. अजूनही शासन दरबारी याबाबत काहीही हालचाल नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

शेतीसाठी बहुतेक शेतकरी कर्ज घेतात. नैसर्गिक अनेक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांचे कर्ज हे त्यांना माघारी करता येत नाही, तर याही अडचणीवर मात करून अनेक शेतकरी आपले कर्ज नियमित फेडतात आणि याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काही फायदा होत नाही. कर्ज फेडणे ही आपली चूक झाली काय? किंवा आपणही कर्ज थकवले पाहिजे होते, ही भावना वाढीस लागू नये म्हणून हे ५० हजार प्रोत्साहानपर देण्याचे आश्वासन विधानसभेत बोलताना अर्थमंत्र्यांनी दिले होते. कोरोना महामारीने याला विलंब झाला असला तरी अजूनही याबाबत काही हालचाल शासन पातळीवर होताना दिसत नाही.

मार्च महिन्यानंतर पुन्हा २०२०-२१ या आर्थिक वर्षाची कृषी कर्जाची वसुली सुरू होणार आहे. त्यापूर्वी शासनाने ही रक्कम नियमित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. तसेच कर्ज भरावे की थकवावे, असा पेचही त्यांना सतावू लागला आहे. महाविकास आघाडीने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी ग्रामीण जनभावना निर्माण झाली आहे.

- चौकट

तीनवेळा माफी; पण लाभ मिळेना!

आजपर्यंत तीनवेळा कर्जमाफी मिळाली. मात्र, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फार काही लाभ मिळाला नाही. गत भाजप व शिवसेना सरकारने या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तो लाभ काही लोकांना मिळाला. या महाविकास आघाडी सरकारने ५० हजार लाभ देण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी त्वरित अंमलात आणावे, अशी जनभावना निर्माण झाली आहे.