शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

प्रोत्साहनपर मदतीपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:11 IST

एक वर्ष होऊनही नियमित शेतकऱ्यांच्या हाती अजून काहीच पडले नाही. त्यामुळे आपल्या तोंडाला या सरकारने पाने पुसल्याची भावना ग्रामीण ...

एक वर्ष होऊनही नियमित शेतकऱ्यांच्या हाती अजून काहीच पडले नाही. त्यामुळे आपल्या तोंडाला या सरकारने पाने पुसल्याची भावना ग्रामीण शेतकऱ्यांची बनली आहे. राज्यात सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करीत महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. दोन लाखांपर्यंत थकीत कृषी कर्ज माफ करण्यात आले. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला. मात्र, यामुळे नियमित कर्ज भरून आपण चूक केली, अशी भावना नियमित खातेदारांत निर्माण होऊ नये म्हणून या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. या घोषणेला वर्ष उलटून गेले तरी मूर्तरूप आलेले नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीही जमा झाले नाही. अजूनही शासन दरबारी याबाबत काहीही हालचाल नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

शेतीसाठी बहुतेक शेतकरी कर्ज घेतात. नैसर्गिक अनेक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांचे कर्ज हे त्यांना माघारी करता येत नाही, तर याही अडचणीवर मात करून अनेक शेतकरी आपले कर्ज नियमित फेडतात आणि याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काही फायदा होत नाही. कर्ज फेडणे ही आपली चूक झाली काय? किंवा आपणही कर्ज थकवले पाहिजे होते, ही भावना वाढीस लागू नये म्हणून हे ५० हजार प्रोत्साहानपर देण्याचे आश्वासन विधानसभेत बोलताना अर्थमंत्र्यांनी दिले होते. कोरोना महामारीने याला विलंब झाला असला तरी अजूनही याबाबत काही हालचाल शासन पातळीवर होताना दिसत नाही.

मार्च महिन्यानंतर पुन्हा २०२०-२१ या आर्थिक वर्षाची कृषी कर्जाची वसुली सुरू होणार आहे. त्यापूर्वी शासनाने ही रक्कम नियमित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. तसेच कर्ज भरावे की थकवावे, असा पेचही त्यांना सतावू लागला आहे. महाविकास आघाडीने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी ग्रामीण जनभावना निर्माण झाली आहे.

- चौकट

तीनवेळा माफी; पण लाभ मिळेना!

आजपर्यंत तीनवेळा कर्जमाफी मिळाली. मात्र, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फार काही लाभ मिळाला नाही. गत भाजप व शिवसेना सरकारने या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तो लाभ काही लोकांना मिळाला. या महाविकास आघाडी सरकारने ५० हजार लाभ देण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी त्वरित अंमलात आणावे, अशी जनभावना निर्माण झाली आहे.