शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
2
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
3
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
4
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
5
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
6
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
7
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
8
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
9
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
10
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
11
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
12
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
13
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
14
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
15
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
16
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
17
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
18
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
19
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
20
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही

शासनाच्या प्रयोगात शेतकरी भूमिहीन -- : डॉ. भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:55 IST

क-हाड येथील विमानतळाचा विस्तार करून शासन काय साधणार आहे? उलट पुसेगाव परिसरात मुबलक जागा उपलब्ध होईल. तिथे विमानतळ उभारावे. - डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल

ठळक मुद्देक-हाडचे विमानतळ गिळणार सुपीक जमिनी

सागर गुजर ।कोल्हापुरात असलेल्या विमानतळाचा किती उपयोग होतो, हे सर्वांनाच माहीत आहे, आता कºहाडातील विमानतळ विस्ताराचा आग्रह अनाठायी आणि अशास्त्रीय असाच आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील. सुपीक जमिनी वाया जातील, शासनाने विमानतळ विस्तार रद्द करणे गरजेचे आहे.

प्रश्न : क-हाडच्या विमानतळ विस्ताराला आपला विरोध का आहे?उत्तर : क-हाड येथील विमानतळ अशास्त्रीय आहे. एका बाजूला आगाशिवनगरचा डोंगर आहे, तर दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिसीटीचे केंद्र, या ठिकाणी विमान उतरवणे धोकादायक आहे. या परिस्थितीत मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या परिसरातील रहिवाशांच्या डोक्यावरही मोठे संकट उभे राहिलेले आहे.

प्रश्न : शेतकऱ्यांचे नुकसान काय होईल, असे वाटते?उत्तर : वारुंजी, मुंढे, केसे, पाडळी या गावांतील शेतकºयांच्या जमिनी विविध कारणांनी यापूर्वीच संपादित केल्या आहेत. वारुंजीचे गावठाण उठवताना त्यांना जमिनी द्याव्या लागल्या होत्या. कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनी द्याव्या लागल्या. क-हाड-चिपळूण महामार्गाच्या कामातही जमिनी गेल्या आहेत. अनेकजण उरलेल्या अर्ध्या एकरात उसासारखे नगदी पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. या शेतकºयांच्या जमिनी विमानतळाच्या विस्तारासाठी घेतल्या तर शेतकरी भूमिहीन होतील, ही भीती आहे.

प्रश्न : जमिनीच्या बदल्यात पैसे दिल्यास तो तोडगा मान्य होईल का?उत्तर : जमिनीच्या बदल्यात पैसे घेतलेल्या वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत आहे. पैसे जास्त काळ टिकत नसतात. चरितार्थ चालविण्यासाठी जमीन लागते. ती कसूनच पुढच्या पिढ्या तगू शकतात, त्यामुळे कितीही पैसे मिळाले तरी ९९ टक्के लोकांना ते नको आहेत. विमानतळाचा विस्तारच लोकांना नको आहे, हवे तर पुसेगाव, निढळच्या माळरानावर ते उभारावे, क-हाडात नको.बैठकीकडे लागल्या नजराक-हाड येथील विमानतळ विस्तारप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले आहे. आता या बैठकीकडे वारुंजी, मुंढे, केसे, पाडळी या गावांतील बाधित शेतकºयांच्या नजरा या लागून राहिल्या आहे. अपेक्षित निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र होणार आहे.तीन वेळा गेल्या हक्काची जमिनी

कृषी महाविद्यालय, महावितरणचा प्रकल्प, कºहाड-चिपळूण महामार्ग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पूर्वीच या शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. येथील शेतकरी आधीच अल्पभूधारक बनले आहेत. कमी जमिनीत कष्ट करून येथील शेतकरी उदरनिर्वाह करत आहेत. आता विमानतळासाठी जमीन घेतल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल.

टॅग्स :AirportविमानतळDamधरण