शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शासनाच्या प्रयोगात शेतकरी भूमिहीन -- : डॉ. भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:55 IST

क-हाड येथील विमानतळाचा विस्तार करून शासन काय साधणार आहे? उलट पुसेगाव परिसरात मुबलक जागा उपलब्ध होईल. तिथे विमानतळ उभारावे. - डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल

ठळक मुद्देक-हाडचे विमानतळ गिळणार सुपीक जमिनी

सागर गुजर ।कोल्हापुरात असलेल्या विमानतळाचा किती उपयोग होतो, हे सर्वांनाच माहीत आहे, आता कºहाडातील विमानतळ विस्ताराचा आग्रह अनाठायी आणि अशास्त्रीय असाच आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील. सुपीक जमिनी वाया जातील, शासनाने विमानतळ विस्तार रद्द करणे गरजेचे आहे.

प्रश्न : क-हाडच्या विमानतळ विस्ताराला आपला विरोध का आहे?उत्तर : क-हाड येथील विमानतळ अशास्त्रीय आहे. एका बाजूला आगाशिवनगरचा डोंगर आहे, तर दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिसीटीचे केंद्र, या ठिकाणी विमान उतरवणे धोकादायक आहे. या परिस्थितीत मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या परिसरातील रहिवाशांच्या डोक्यावरही मोठे संकट उभे राहिलेले आहे.

प्रश्न : शेतकऱ्यांचे नुकसान काय होईल, असे वाटते?उत्तर : वारुंजी, मुंढे, केसे, पाडळी या गावांतील शेतकºयांच्या जमिनी विविध कारणांनी यापूर्वीच संपादित केल्या आहेत. वारुंजीचे गावठाण उठवताना त्यांना जमिनी द्याव्या लागल्या होत्या. कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनी द्याव्या लागल्या. क-हाड-चिपळूण महामार्गाच्या कामातही जमिनी गेल्या आहेत. अनेकजण उरलेल्या अर्ध्या एकरात उसासारखे नगदी पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. या शेतकºयांच्या जमिनी विमानतळाच्या विस्तारासाठी घेतल्या तर शेतकरी भूमिहीन होतील, ही भीती आहे.

प्रश्न : जमिनीच्या बदल्यात पैसे दिल्यास तो तोडगा मान्य होईल का?उत्तर : जमिनीच्या बदल्यात पैसे घेतलेल्या वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत आहे. पैसे जास्त काळ टिकत नसतात. चरितार्थ चालविण्यासाठी जमीन लागते. ती कसूनच पुढच्या पिढ्या तगू शकतात, त्यामुळे कितीही पैसे मिळाले तरी ९९ टक्के लोकांना ते नको आहेत. विमानतळाचा विस्तारच लोकांना नको आहे, हवे तर पुसेगाव, निढळच्या माळरानावर ते उभारावे, क-हाडात नको.बैठकीकडे लागल्या नजराक-हाड येथील विमानतळ विस्तारप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले आहे. आता या बैठकीकडे वारुंजी, मुंढे, केसे, पाडळी या गावांतील बाधित शेतकºयांच्या नजरा या लागून राहिल्या आहे. अपेक्षित निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र होणार आहे.तीन वेळा गेल्या हक्काची जमिनी

कृषी महाविद्यालय, महावितरणचा प्रकल्प, कºहाड-चिपळूण महामार्ग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पूर्वीच या शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. येथील शेतकरी आधीच अल्पभूधारक बनले आहेत. कमी जमिनीत कष्ट करून येथील शेतकरी उदरनिर्वाह करत आहेत. आता विमानतळासाठी जमीन घेतल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल.

टॅग्स :AirportविमानतळDamधरण