शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

फटाके फोडल्यानंतरच शेतात शेतकरी करतोय ‘एन्ट्री’

By admin | Updated: August 26, 2015 21:21 IST

जीव वाचविण्यासाठी नवा फंडा : जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे मोर्चा

ढेबेवाडी : नैसर्गिक वृक्षांच्या जंगलात मानवनिर्मित पवनऊर्जा प्रकल्पांची जंगले निर्माण झाल्याने पाटण तालुक्यातील वाल्मीक परिसरातील वनसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पवनऊर्जा प्रकल्पाच्या भिरभिरणाऱ्या पात्यांचा आवाज आणि बेकायदा शिकारीचे वाढते प्रमाण वन्यप्राण्यांच्या जीवनावर उठल्याने सैरभैर झालेल्या वन्य पशुपक्ष्यांनी आपली पावले मानवी वस्तीकडे वळवली आहेत. दरम्यान, फटाके फोडूनच शेतकरी शेतात जात आहेत.सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांची हद्द म्हणजे पाटण तालुक्यातील वाल्मीक पठार! ढेबेवाडीपासून पश्चिमेला सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या पठाराच्या एका बाजूस चांदोली अभयारण्य तर दुसऱ्या बाजूस कोयना अभयारण्य आहे. अनेक वर्षांपासून हिरवीगार झालर पांघरलेल्या या वाल्मीक पठारावर आणि जंगलात मोठ्या प्रमाणावर पट्टेरी वाघ, बिबट्या, अस्वले, गवे, डुकरे, साळिंदर, कोल्हे आदी जंगली प्राण्यांसह पक्ष्यांचीही वर्दळ असल्याचे वनविभागाकडे नोंद असायचीया वाल्मीकच्या जंगलाची आणि तेथील पशुपक्ष्यांची संख्या कमालीची घटत चालली आहे. त्यामुळे वाल्मिक केवळ नावापुरतेच राहणार का ? असा प्रश्न पशुपक्षी तज्ज्ञांसह निसर्गमित्रांना भेडसावत आहे. (वार्ताहर) गवे-रानडुकरांचा शेतातच मुक्काम४विभागातील शेतकऱ्यांत वन्य प्राण्यांची कमालीची दहशत पसरली आहे. शेतात पिके मोठी झाल्याने गवे, रानडुकरांचे कळप शेतातील जुन्या राहुटीत राहू लागलेत. शेतात काम करताना अचानक अशा प्राण्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आता नवा फंडा शोधला आहे. शेतात प्रवेश करताना फटाके फोडायचे. ज्यामुळे त्याच्या आवाजाने शेतातील प्राणी धूम ठोकतात. वन्यप्राणी आणि वनसंपदेची जबाबदारी जरी वनविभागाची असली तरीसुध्दा सुज्ञ नागरिकांनी चोरट्या शिकारीची चाहूल लागताच आमच्याशी संपर्क साधल्यास चोरट्या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल. - किरण कांबळे, वनक्षेत्रपाल