शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रासाठी वेदनादायी

By admin | Updated: December 28, 2015 00:33 IST

आसाराम लोमटे : बलवडी (भा.) येथील २४ वे मराठी साहित्य संमेलन

आळसंद : पुरोगामित्वाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रासाठी काळाकुट्ट अंधार असून, हा काळाकुट्ट अंधार नाहीसा करण्याचे काम साहित्यिकांनी करावे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्येची कारणे व उपाय शोधून साहित्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जगण्याची उमेद निर्माण करण्याचे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक व पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले. बलवडी (भा., ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाच्या आयोजित २४ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, उद्योजक सतीश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, सरपंच सौ. मनीषा दुपटे, उपसरपंच बापूसाहेब पवार उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते झाले. आसाराम लोमटे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. (बापू) लाड या क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या एकजुटीतून दुष्काळ निवारणासाठी ‘बळिराजा’ धरणाची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील साहित्य संमेलने ही मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम करतात. माणसाचं जगणं आणि साहित्य यात अंतर नसावे. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, साहित्य हे समाजाची आई व आत्मा असून, त्याला जपले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळातही मोठा दुष्काळ होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. त्या काळात संतसाहित्याने शेतकऱ्यांना जगण्यास मोठे बळ दिले होते. दु:ख विसरण्याचा मार्ग संतांनी दिला होता. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या साहित्याची गरज असून, त्याची साहित्यिकांवर मोठी जबाबदारी आहे. मात्र सध्याच्या साहित्यिकांकडे पाहिले, तर साहित्याचे बाजारीकरण झाल्याची खंत खोत यांनी व्यक्त केली. खोत म्हणाले, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले. याचे मला वाईट वाटतेच; पण ५ लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यावेळी हेच सहिष्णूत साहित्यिक कुठे गेले होते? असा सवाल त्यांनी केला. साहित्यिकांची पांढऱ्या कागदावरची लेखणी थांबली तरी, काहीही फरक पडणार नाही. परंतु काळ्या भुईवरची शेतकऱ्यांची लेखणी थांबली, तर त्यावेळी सर्वकाही थांबेल, याचे भान ठेवून साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून बळिराजाच्या व्यथा व वेदना मांडल्या पाहिजेत. उद्योजक सतीश चव्हाण म्हणाले, ग्रामीण भागातील महिला वर्ग अजून विज्ञान युगातही कर्मकांडात अडकला आहे. उपवास-तापास, पूजा-अर्चा यातच आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. महिलांना या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी पुरुषांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.यावेळी ‘बलवडी भूषण’ पुरस्कार मनोहर पवार, ‘कृषिभूषण’ दशरथ पवार, तर ‘ज्योतिर्लिंग वाङ्मय’ पुरस्कार रघुराज मेटकरी यांना मान्यवरांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘आदर्श शिक्षक’ सयाजी जाधव, अंध खेळाडू स्वाती चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अंधकवी चंद्रकांत देशमुख, रघुनाथ पवार, पांडुरंग शितोळे, सतीश लोखंडे, सुरेश चव्हाण, सौ. अश्विनी चव्हाण, टी. के. पवार, रमेश सावंत, प्रताप जाधव, गणेश पवार, संजय निकम, देवकुमार दुपटे, शांतिनाथ मांगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक दीपक पवार यांनी केले, आभार संतोष जाधव यांनी मानले. (वार्ताहर)