शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘लॉकडाऊन’मध्ये वाढला कौटुंबिक कलह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:36 IST

कऱ्हाड : संसार म्हटलं की वाद होणारच; पण जोपर्यंत हा वाद चार भिंतीत असतो तोपर्यंत घराला घरपण असतं. वाद ...

कऱ्हाड : संसार म्हटलं की वाद होणारच; पण जोपर्यंत हा वाद चार भिंतीत असतो तोपर्यंत घराला घरपण असतं. वाद पोलीस ठाण्यात पोहोचला तर कुटुंबाची वाताहत होते. गतवर्षीपासून ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कौटुंबिक कलहाच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलीस ठाण्यातील विशेष कक्षानेही त्याला दुजोरा दिला असून आर्थिक ओढाताण, बंदिस्त जीवनशैली, मानसिक घुसमट यासह अन्य कारणांनी हे वाद होत असल्याचे तक्रारींवरून दिसून येते.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात कौटुंबिक वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी ‘कौटुंबिक विशेष कक्ष’ कार्यरत आहे. पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या कौटुंबिक तक्रारी सुरुवातीला या कक्षाकडे वर्ग केल्या जातात. तेथे तक्रारदार व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे समुपदेशन केले जाते. त्यातून तुटण्याच्या मार्गावर असलेली नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो. शहर पोलीस ठाण्यातील या कक्षाकडे दाखल होणाऱ्या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी पती-पत्नीमधील वादाच्या असतात. मात्र, गत वर्षभरात पती-पत्नीमधील वादासह कुटुंबातील अन्य नात्यांतील वादही या कक्षापर्यंत पोहोचलेत. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत या तक्रारींचे प्रमाण वाढल्याचे समुपदेशक सांगतात.

‘लॉकडाऊन’मध्ये प्रत्येकाला घरात रहावे लागले. यावेळी मतमतांतरे, भिन्न विचारांमुळे काही कुटुंबात विसंवाद घडलेत. तसेच या कालावधीत प्रत्येकाला आर्थिक ओढाताण सहन करावी लागली. आर्थिक कारणास्तवही काही कुटुंबात वाद झालेत. वैद्यकीय कारणास्तवही कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण बनून त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाल्याचे काही तक्रारींमधून दिसत असल्याचे समुपदेशक सविता खवळे यांनी सांगीतले.

- चौकट

वर्षभरातील तक्रारी

एकूण दाखल : १४६

तडजोड झालेल्या : ९३

संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या : २२

कायदेशीर सल्लागारांकडे पाठविलेल्या : २४

पोलिसांकडे वर्ग केलेल्या : २

प्रतिसाद न मिळालेल्या : ३

इतर संस्थेकडे पाठविलेल्या : २

- चौकट

तक्रारींमधील कारणे

हुंडा मागणी : २

ताणतणाव : ४

संपत्तीचा वाद : ३

कौटुंबिक हिंसाचार : ३५

मुलाकडून होणारा त्रास : २

सुनेकडून होणारा त्रास : १

शारीरीक, मानसिक छळ : १४

व्यक्तिमत्वातील दोष : १

संसारात हस्तक्षेप : ३

व्यसनाधीनता : १२

पुनर्विवाह : ३

संशय वृत्ती : ७

पती-पत्नीचे दुर्लक्ष : ३९

- चौकट

२२ विवाहितांनी घेतला कायद्याचा आधार

पती आणि पत्नीमधील वाद सामोपचाराने मिटत नसेल. आणि तक्रारदार पत्नीला घटस्फोट न घेता, विभक्त न होताच कायद्याचे संरक्षण घ्यायचे असेल तर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये तिला संरक्षण मिळते. महिला व बालकल्याणच्यावतीने त्यासाठी संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. कऱ्हाडातील २२ तक्रारदार विवाहितांनी गत वर्षभरात या कायद्याचे संरक्षण घेतले आहे.

- कोट

पती आणि पत्नीमध्ये वाद होणं स्वाभाविक आहे; पण हा वाद टोकाला जाऊ नये, याची खबरदारी दोघांनीही घ्यायला हवी. दोघांचा संसार सुखाचा व्हावा, यामध्ये कुटुंबीयांची भूमिकाही महत्त्वाची आहे. गत वर्षभरात तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्या तक्रारी सामोपचाराने मिटविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- सविता खवळे

समुपदेशक, कौटुंबिक विशेष कक्ष

फोटो : १६केआरडी०१

कॅप्शन : प्रतीकात्मक