शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आमदारांना कारखाना वारसाने मिळाला

By admin | Updated: February 19, 2017 00:08 IST

दमयंतीराजे : शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता टीका; शेंद्रे गटात प्रचारसभा

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी वडिलांचे छत्र हरपल्यावर केलेला कडवा संघर्ष आणि कष्टातून काढलेला मार्ग तसेच आमदारांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वडिलोपार्जित वारसा या बाबी नकीच मतदारांनी आणि जनतेने तपासल्या पाहिजेत. आमदारांना कारखाना, बँक, बझार, गिरणी वडिलांपासून वारसाने मिळाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. जनतेच्या हिताकरिता संघर्ष करणाऱ्या उदयनराजेंनी कोणाचेही पाठबळ नसताना समाजकारण करताना जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे,’ असे प्रतिपादन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका दमयंतीराजे भोसले यांनी केले. सातारा विकास आघाडीच्या शेंद्रे गट, गण आणि दरे खुर्द गणातील उमेदवारांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. जकातवाडी, वेचले, भरतगाववाडी, बोरगाव येथे सभा झाली. यावेळी शेंद्रे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ योगेश शिंदे, शेंद्रे गणाच्या उमेदवार मनीषा क्षीरसागर आणि दरे खुर्द गणाचे उमेदवार हणमंत गुरव, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, अ‍ॅड. अंकुशराव जाधव, नगरसेविका स्मिता घोडके, स्रेहा नलवडे, सरपंच सीताबाई पवार, उपसरपंच दीपक देशमुख, बाजीराव बाबर, रवी पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सुनील काटकर म्हणाले,‘सर्वांनी ठरविले होते की उदयनराजे देतील त्या उमेदवाराचे आपण काम करायचे. अधिकृतपणे मला उमेदवारी मिळाली; परंतु दुसऱ्याचे चांगले झालेले न पाहावणारी मंडळींपैकी एकाने अर्ज माघारी न घेता बंडखोरी केली. तथापि, सातारा विकास आघाडीला धोका होऊ नये म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेतली आहे. लोकांनी राजकारणामधील काही संकेत समजून घेऊन आपल्या इच्छा व्यक्त करायच्या असतात. दुसऱ्याला मागे खेचण्याची वृत्ती शेंद्रे गटातील जनता कधीही स्वीकारणार नाही.’यावेळी सर्जेराव मोहिते, दगडू सुतार, विजय पडवळ, उत्तम भोसले, धनराज दौंडे, संजय सणस, संतोष लोंढे, सागर शिंदे, दीपक देवकर, धनंजय सणस, वैभव शिंदे, अमोल कांबळे, प्रसाद शेळके, महेश भोसले, गोविंद देशमुख, सतीश पवार, रवींद्र चव्हाण, भानुदास गोळे, विकास माने, धनाजी शेडगे, हिम्मतराव जाधव, नंदू पोतेकर, बजरंग कदम, संजय पोतेकर,राजेंद्र गोडसे आदी उपस्थित होते. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच दीपक देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) उदयनराजेंचे यश विरोधकांना सहन होत नाहीदमयंतीराजे म्हणाल्या, ‘खासदार उदयनराजेंना कोणाचेही विशेष पाठबळ नाही. त्यांनी पदाची अपेक्षा ठेवून कधी राजकारण केले नाही. नाही तर आजपर्यंत त्यांना अनेकवेळा मंत्रिपदे मिळाली असती. तथापि त्यांनी कोणत्याही पदापेक्षा जनतेच्या मनामध्ये असलेले स्थान याला जास्त महत्त्व दिले आहे. सर्वसामान्य जनतेचा असलेले प्रचंड विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती आहे. जनेतच्या प्रेमाच्या ताकदीवरच उच्चांकी मताधिक्य मिळाले आहे. आणि हेच विरोधकांना सहन होत नाही.’