शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

आमदारांना कारखाना वारसाने मिळाला

By admin | Updated: February 19, 2017 00:08 IST

दमयंतीराजे : शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता टीका; शेंद्रे गटात प्रचारसभा

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी वडिलांचे छत्र हरपल्यावर केलेला कडवा संघर्ष आणि कष्टातून काढलेला मार्ग तसेच आमदारांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वडिलोपार्जित वारसा या बाबी नकीच मतदारांनी आणि जनतेने तपासल्या पाहिजेत. आमदारांना कारखाना, बँक, बझार, गिरणी वडिलांपासून वारसाने मिळाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. जनतेच्या हिताकरिता संघर्ष करणाऱ्या उदयनराजेंनी कोणाचेही पाठबळ नसताना समाजकारण करताना जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे,’ असे प्रतिपादन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका दमयंतीराजे भोसले यांनी केले. सातारा विकास आघाडीच्या शेंद्रे गट, गण आणि दरे खुर्द गणातील उमेदवारांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. जकातवाडी, वेचले, भरतगाववाडी, बोरगाव येथे सभा झाली. यावेळी शेंद्रे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ योगेश शिंदे, शेंद्रे गणाच्या उमेदवार मनीषा क्षीरसागर आणि दरे खुर्द गणाचे उमेदवार हणमंत गुरव, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, अ‍ॅड. अंकुशराव जाधव, नगरसेविका स्मिता घोडके, स्रेहा नलवडे, सरपंच सीताबाई पवार, उपसरपंच दीपक देशमुख, बाजीराव बाबर, रवी पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सुनील काटकर म्हणाले,‘सर्वांनी ठरविले होते की उदयनराजे देतील त्या उमेदवाराचे आपण काम करायचे. अधिकृतपणे मला उमेदवारी मिळाली; परंतु दुसऱ्याचे चांगले झालेले न पाहावणारी मंडळींपैकी एकाने अर्ज माघारी न घेता बंडखोरी केली. तथापि, सातारा विकास आघाडीला धोका होऊ नये म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेतली आहे. लोकांनी राजकारणामधील काही संकेत समजून घेऊन आपल्या इच्छा व्यक्त करायच्या असतात. दुसऱ्याला मागे खेचण्याची वृत्ती शेंद्रे गटातील जनता कधीही स्वीकारणार नाही.’यावेळी सर्जेराव मोहिते, दगडू सुतार, विजय पडवळ, उत्तम भोसले, धनराज दौंडे, संजय सणस, संतोष लोंढे, सागर शिंदे, दीपक देवकर, धनंजय सणस, वैभव शिंदे, अमोल कांबळे, प्रसाद शेळके, महेश भोसले, गोविंद देशमुख, सतीश पवार, रवींद्र चव्हाण, भानुदास गोळे, विकास माने, धनाजी शेडगे, हिम्मतराव जाधव, नंदू पोतेकर, बजरंग कदम, संजय पोतेकर,राजेंद्र गोडसे आदी उपस्थित होते. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच दीपक देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) उदयनराजेंचे यश विरोधकांना सहन होत नाहीदमयंतीराजे म्हणाल्या, ‘खासदार उदयनराजेंना कोणाचेही विशेष पाठबळ नाही. त्यांनी पदाची अपेक्षा ठेवून कधी राजकारण केले नाही. नाही तर आजपर्यंत त्यांना अनेकवेळा मंत्रिपदे मिळाली असती. तथापि त्यांनी कोणत्याही पदापेक्षा जनतेच्या मनामध्ये असलेले स्थान याला जास्त महत्त्व दिले आहे. सर्वसामान्य जनतेचा असलेले प्रचंड विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती आहे. जनेतच्या प्रेमाच्या ताकदीवरच उच्चांकी मताधिक्य मिळाले आहे. आणि हेच विरोधकांना सहन होत नाही.’