शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दुसर्‍या हप्त्याबाबत कारखानदारी चिडीचूप

By admin | Updated: June 16, 2014 12:24 IST

केंद्र शासनाचे आदेश पाळून आम्ही उसाला दर दिला असून, 'भविष्यात दुसरा हप्ता हा शब्दच विसरा,' अशीच भूमिका जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखानदारांनी जाहीर केली आहे.

 
संजय कदम■ वाठार स्टेशन 
उत्पादन खर्चावर आधारभूत किमती (एफआरपी) प्रमाणे केंद्र शासनाचे आदेश पाळून आम्ही उसाला दर दिला असून, 'भविष्यात दुसरा हप्ता हा शब्दच विसरा,' अशीच भूमिका जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखानदारांनी जाहीर केली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. 
केंद्र शासनाने ९.३0 टक्के साखर उतार्‍यासाठी २,१00 रुपये व पुढील प्रत्येक एक टक्क्यासाठी २२१ रुपये 'एफआरपी' जाहीर केली. त्यापेक्षा कमी दर देणार्‍यांवर कारवाई करण्याचेही संकेत दिले.
चालू गाळप हंगाम २0१३-१४ मध्ये उसाला किमान तीन हजार दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्याला आंदोलनाचा केंद्रबिंदू केले. या दरम्यान, हिंसक आंदोलने झाली. शेतकर्‍यांनीही यास मोठा प्रतिसाद दिला; परंतु हे आंदोलन पद्धतशीरपणे मोडीत काढण्यात शासन व कारखानदारांना यश मिळाले. आणि उसाला दरही अपेक्षापेक्षा कमी मिळाला, यामुळे चालू हंगामात ऊसदर १,८00 ते २,२५0 रुपये याच दरम्यान स्थिर झाला.
तीन हजारांची अपेक्षा केलेल्या शेतकर्‍याला २,२00 रुपये देणेही मुश्किल असल्याची भूमिका जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी व्यक्त केली असून कारखानदारांच्या या भूमिकेबाबत राज्याचे सह साखर संचालक शेळके यांनीही दुजोरा देत साखरेच्या किमतीबाबत स्थिरता नसल्याने कारखानदारांना शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण करणे अवघड असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तीन हजारांची मागणी असणार्‍या शेतकरी संघटनेला कितपत प्रतिसाद मिळणार? हा प्रश्नच आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर कारखान्याने चालू हंगामात २,१२२ चा पहिला हप्ता जाहीर केला. यामधील १५ मार्च २0१४ पासून गळीत केलेल्या उसाला अद्याप पहिला हप्ताही मिळाला नसल्याने कारखान्याबाबत तक्रारही दाखल झाली आहे. तसेच ज्या ऊस उत्पादकांनी सेवा सोसायटींची कज्रे बँकेतून घेतली, याच लोकांची जेवढी सोसायटी आहे तेवढीच जमा करण्याचे काम या कारखान्याने केले आहे. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत गाळप केलेल्या उसाचा पहिला हप्ता कारखान्याने देणे बंधनकारक असतानाही किसन वीर बाबत अद्याप साखर संचालकही मौन बाळगून आहेत. याबाबत 'लोकमत'शी बोलताना किसन वीरचे कार्यकारी संचालक वाबळे म्हणाले, 'बँकेकडूनच ऊस बिल रक्कम देण्याबाबत दिरंगाई होत असल्याने ऊस उत्पादकांची देय रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
 
२0१३-१४ मध्ये जिल्ह्यातील कारखान्यांचा दिलेला दर
अक्र.कारखाना           पहिला हप्ता
जरंडेश्‍वर२२३४
बाळासाहेब देसाई पाटण२२५0
सह्याद्री२२00
कृष्णा२२२१
साखरवाडी१८00+१00=१९00
किसन वीर२१२२
प्रतापगड२१२२
रयत२२५0
अजिंक्यतारा२२१0
१0श्रीराम-फलटण२000
११जयवंत शुगर२२१५
---------------
चालू हंगामात केंद्र शासनाच्या एफआरपीप्रमाणे आमच्या कारखान्याने तोडणी वाहतूकवजा करून १,८00 रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आहे. कारखान्याची एफआरपी १,९00 रुपयेच असल्याने उर्वरित १00 रुपये कारखाना शेतकर्‍यांना देणार आहे.
- प्रल्हादराव साळुंखे-पाटील,चेअरमन, न्यू फलटण शुगर, साखरवाडी
---------------
सद्य:स्थितीत साखर कारखान्यांना शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण करणे अवघड बाब असून, सध्या साखरेनुसार ऊसदर वाढवण्याची मागणी चुकीची आहे. सहा महिन्यांपूर्वी २,२00 ते २,४00 हा साखरेचा दर होता. या दराने बहुतांशी कारखान्यांची साखर विक्री केली, त्यामुळे सध्या कारखान्याकडे साखर विक्री करायला साखरच नाही. याशिवाय ज्या बँकाकडून वेळेत पैसे कारखान्यांना मिळणे गरजेचे होते, याबाबत बँका दिरंगाई करीत आहेत.
- के.एम.शेळके, सहसंचालक साखर संकुल, पुणे