शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

नजर हटते..दुर्घटना घडते !

By admin | Updated: November 28, 2014 00:12 IST

महामार्गाची दुरवस्था : साईडपट्ट्या खचल्याने वाहने कलंडण्याचे प्रमाण वाढले

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेगही जीवघेणा झाला आहे. बहुतांशी अपघात हे सुसाट वेगाने होत असले तरी महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौकापर्यंत महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.रात्रीच्या सुमारास वाहन चालविताना थोडी नजर हटली तरी अपघात झालाच म्हणून समजा, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शिवराज पेट्रोल पंपापासून अजंठा चौकापर्यंत तीव्र उतार आहे. या उतारावरील साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अचानक अनेक वाहने कलंडत आहेत. महामार्गाच्या कडेला रिफ्लॅक्टर नाहीत. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. गेल्या तीन महिन्यांत या चौकात वाहन कलंडून सात अपघात झाले आहेत. त्यामध्ये गंभीर अपघात म्हणजे कंटेनर कारवर कोसळला होता. दुसरी घटना त्याच ठिकाणी एक ट्रक साईडपट्टीवरून नाल्यात उलटला होता. अशा प्रकारे वारंवार अपघात होत आहेत. मात्र, प्रशासनाचे अद्याप याकडे लक्ष नाही. महामार्गावरून सुसाटपणे धावणारी वाहने इतरांच्या अंगावर शहारे आणतात. त्यातच एखाद्या पादचाऱ्याला अथवा वाहनांना ठोकरल्यानंतर ही वाहने तेथे तत्काळ न थांबता पुढे निघून जात आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, लिंब खिंड ही ठिकाणे अत्यंत धोकादायक बनली आहेत. (प्रतिनिधी)वाळू रस्त्यावररात्रीच्या सुमारास अवैध वाळूउपसा करणाऱ्या ट्रॉली महामार्गावरून जात असल्याने रस्त्यावर छोटे-छोटे वाळूचे कण पडलेले आहेत. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौक या दरम्यान नेहमी रहदारी असते. या परिसरामध्ये शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा टापू खरंतर सुरक्षित पाहिजे; परंतु केवळ तात्पुरती डागडुजी करून पुन्हा रस्ते जैथे होत असतात. साईडपट्टी आणि सेवा रस्त्याच्या उंचीमध्ये बराच फरक असल्यामुळे अपघात होत असतात, असे रस्ता बनविणाऱ्या अभियंत्यांचे म्हणणे आहे.