शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

नजर हटते..दुर्घटना घडते !

By admin | Updated: November 28, 2014 00:12 IST

महामार्गाची दुरवस्था : साईडपट्ट्या खचल्याने वाहने कलंडण्याचे प्रमाण वाढले

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेगही जीवघेणा झाला आहे. बहुतांशी अपघात हे सुसाट वेगाने होत असले तरी महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौकापर्यंत महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.रात्रीच्या सुमारास वाहन चालविताना थोडी नजर हटली तरी अपघात झालाच म्हणून समजा, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शिवराज पेट्रोल पंपापासून अजंठा चौकापर्यंत तीव्र उतार आहे. या उतारावरील साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अचानक अनेक वाहने कलंडत आहेत. महामार्गाच्या कडेला रिफ्लॅक्टर नाहीत. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. गेल्या तीन महिन्यांत या चौकात वाहन कलंडून सात अपघात झाले आहेत. त्यामध्ये गंभीर अपघात म्हणजे कंटेनर कारवर कोसळला होता. दुसरी घटना त्याच ठिकाणी एक ट्रक साईडपट्टीवरून नाल्यात उलटला होता. अशा प्रकारे वारंवार अपघात होत आहेत. मात्र, प्रशासनाचे अद्याप याकडे लक्ष नाही. महामार्गावरून सुसाटपणे धावणारी वाहने इतरांच्या अंगावर शहारे आणतात. त्यातच एखाद्या पादचाऱ्याला अथवा वाहनांना ठोकरल्यानंतर ही वाहने तेथे तत्काळ न थांबता पुढे निघून जात आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, लिंब खिंड ही ठिकाणे अत्यंत धोकादायक बनली आहेत. (प्रतिनिधी)वाळू रस्त्यावररात्रीच्या सुमारास अवैध वाळूउपसा करणाऱ्या ट्रॉली महामार्गावरून जात असल्याने रस्त्यावर छोटे-छोटे वाळूचे कण पडलेले आहेत. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. शिवराज पेट्रोलपंप ते अजंठा चौक या दरम्यान नेहमी रहदारी असते. या परिसरामध्ये शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा टापू खरंतर सुरक्षित पाहिजे; परंतु केवळ तात्पुरती डागडुजी करून पुन्हा रस्ते जैथे होत असतात. साईडपट्टी आणि सेवा रस्त्याच्या उंचीमध्ये बराच फरक असल्यामुळे अपघात होत असतात, असे रस्ता बनविणाऱ्या अभियंत्यांचे म्हणणे आहे.