शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

पेपर पुनर्तपासणीला विद्यापीठाकडून मुदतवाढ

By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST

‘लेट फी’चा प्रश्न मात्र लटकलेलाच : विद्यार्थ्यांचे व्यवस्थापनासमोर गाऱ्हाणे, अर्ज करण्यास आणखी पाच दिवस मुभा---लोकमतचा दणका

कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल जाहीर झाला असला तरी पेपर पुनर्तपासणीसाठीची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने सोमवारी विद्यार्थ्यांची ही फरपट उघडकीस आणल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून मुदत वाढवून देण्याची विनंती केली. विद्यापीठानेही पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठीची मुदतही सध्या संपली असून, विद्यार्थ्यांना ‘लेट फी’ भरावी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत विद्यापीठाने अद्यापही निर्णय न दिल्याने विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने राखून ठेवला होता. डिसेंबर महिन्यात प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर जानेवारीच्या २० तारखेपर्यंत विद्यापीठाने निकाल जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, कऱ्हाडच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याचे सांगून विद्यापीठाने तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल अडवून ठेवला. इतर महाविद्यालयांचा निकाल मात्र १६ जानेवारीलाच जाहीर करण्यात आला. आठ दिवसांच्या निर्धारित मुदतीत संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणी अर्ज भरून विद्यापीठाकडे सादर केला. तसेच दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र, कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकालच जाहीर न झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. ‘लोकमत’ने या प्रकाराचा वाचा फोडल्यानंतर विद्यापीठाने तातडीने कऱ्हाडच्या अभियांत्रिकीचा निकाल जाहीर केला. मुळात निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज करण्यास मुदत मिळाली नाही. याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. त्याला विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाने पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना दि. ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, ‘लेट फी’चा प्रश्न अद्यापही निकाली निघालेलानाही. (प्रतिनिधी)... तर फॉर्म भरणार नसल्याचा इशारा- --अभियांत्रिकीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून विलंब झाला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून ‘लेट फी’ घेणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे. जोपर्यंत मुदत वाढवून मिळत नाही, तोपर्यंत एकही विद्यार्थी दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरणार नसल्याचा इशारा विद्यार्थी जनरल सेक्रेटरी मंगेश सुरुसे व पवन घोडस्कार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.