शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

पेपर पुनर्तपासणीला विद्यापीठाकडून मुदतवाढ

By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST

‘लेट फी’चा प्रश्न मात्र लटकलेलाच : विद्यार्थ्यांचे व्यवस्थापनासमोर गाऱ्हाणे, अर्ज करण्यास आणखी पाच दिवस मुभा---लोकमतचा दणका

कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल जाहीर झाला असला तरी पेपर पुनर्तपासणीसाठीची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने सोमवारी विद्यार्थ्यांची ही फरपट उघडकीस आणल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून मुदत वाढवून देण्याची विनंती केली. विद्यापीठानेही पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठीची मुदतही सध्या संपली असून, विद्यार्थ्यांना ‘लेट फी’ भरावी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत विद्यापीठाने अद्यापही निर्णय न दिल्याने विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने राखून ठेवला होता. डिसेंबर महिन्यात प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर जानेवारीच्या २० तारखेपर्यंत विद्यापीठाने निकाल जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, कऱ्हाडच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याचे सांगून विद्यापीठाने तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल अडवून ठेवला. इतर महाविद्यालयांचा निकाल मात्र १६ जानेवारीलाच जाहीर करण्यात आला. आठ दिवसांच्या निर्धारित मुदतीत संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणी अर्ज भरून विद्यापीठाकडे सादर केला. तसेच दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र, कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकालच जाहीर न झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. ‘लोकमत’ने या प्रकाराचा वाचा फोडल्यानंतर विद्यापीठाने तातडीने कऱ्हाडच्या अभियांत्रिकीचा निकाल जाहीर केला. मुळात निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज करण्यास मुदत मिळाली नाही. याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. त्याला विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाने पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना दि. ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, ‘लेट फी’चा प्रश्न अद्यापही निकाली निघालेलानाही. (प्रतिनिधी)... तर फॉर्म भरणार नसल्याचा इशारा- --अभियांत्रिकीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून विलंब झाला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून ‘लेट फी’ घेणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे. जोपर्यंत मुदत वाढवून मिळत नाही, तोपर्यंत एकही विद्यार्थी दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरणार नसल्याचा इशारा विद्यार्थी जनरल सेक्रेटरी मंगेश सुरुसे व पवन घोडस्कार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.