शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पेपर पुनर्तपासणीला विद्यापीठाकडून मुदतवाढ

By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST

‘लेट फी’चा प्रश्न मात्र लटकलेलाच : विद्यार्थ्यांचे व्यवस्थापनासमोर गाऱ्हाणे, अर्ज करण्यास आणखी पाच दिवस मुभा---लोकमतचा दणका

कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल जाहीर झाला असला तरी पेपर पुनर्तपासणीसाठीची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने सोमवारी विद्यार्थ्यांची ही फरपट उघडकीस आणल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून मुदत वाढवून देण्याची विनंती केली. विद्यापीठानेही पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठीची मुदतही सध्या संपली असून, विद्यार्थ्यांना ‘लेट फी’ भरावी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत विद्यापीठाने अद्यापही निर्णय न दिल्याने विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने राखून ठेवला होता. डिसेंबर महिन्यात प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर जानेवारीच्या २० तारखेपर्यंत विद्यापीठाने निकाल जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, कऱ्हाडच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याचे सांगून विद्यापीठाने तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल अडवून ठेवला. इतर महाविद्यालयांचा निकाल मात्र १६ जानेवारीलाच जाहीर करण्यात आला. आठ दिवसांच्या निर्धारित मुदतीत संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणी अर्ज भरून विद्यापीठाकडे सादर केला. तसेच दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र, कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकालच जाहीर न झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. ‘लोकमत’ने या प्रकाराचा वाचा फोडल्यानंतर विद्यापीठाने तातडीने कऱ्हाडच्या अभियांत्रिकीचा निकाल जाहीर केला. मुळात निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज करण्यास मुदत मिळाली नाही. याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. त्याला विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाने पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना दि. ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, ‘लेट फी’चा प्रश्न अद्यापही निकाली निघालेलानाही. (प्रतिनिधी)... तर फॉर्म भरणार नसल्याचा इशारा- --अभियांत्रिकीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून विलंब झाला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून ‘लेट फी’ घेणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे. जोपर्यंत मुदत वाढवून मिळत नाही, तोपर्यंत एकही विद्यार्थी दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरणार नसल्याचा इशारा विद्यार्थी जनरल सेक्रेटरी मंगेश सुरुसे व पवन घोडस्कार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.