शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेत १०३ टीएमसी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाची पूर्णपणे उघडीप असून कोयनेला ३ तर नवजाला फक्त १ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. सकाळच्या सुमारास ...

सातारा : जिल्ह्यात पावसाची पूर्णपणे उघडीप असून कोयनेला ३ तर नवजाला फक्त १ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. सकाळच्या सुमारास कोयनेत १०३.३० टीएमसी साठा झाला होता. तर आवक बऱ्यापैकी होत असल्याने कोयनेसह धोम, कण्हेर आणि बलकवडी या प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस सुरू होता. हा पाऊस पूर्व तसेच पश्चिम भागातही चांगला पडला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पूर्वेकडील दुष्काळी भागात तर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. खरीप हंगामत शेतकऱ्यांनी घेतलेल्या बाजरी, मूग, मटकी, मका आदी पिके चांगली आली. तसेच दुष्काळी भागातील काही ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. बंधाऱ्यातही चांगला पाणीसाठा होऊ लागला आहे.

पश्चिमेकडेही पावसाची चांगली बरसात झाली. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली आणि तापोळा भागात सतत १५ दिवस पाऊस होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी अशा प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढू लागला. त्यातच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरण यंदा उशिरा का असेना काठोकाठ भरलं. त्यामुळे आवक वाढलेली पाहून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला.

यावर्षी कोयना धरणाच्या दरवाजातून दुसऱ्यावेळी विसर्ग करण्यात आला. पाऊस वाढल्याने रविवारी कोयना धरणातील साठा १०४ टीएमसीच्या वर गेला होता. त्यावेळी प्रथम सहा दरवाजे एक फुटाने उचलून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. शेवटी सव्वा पाच फुटांपर्यंत वर दरवाजे घेण्यात आले होते. यामुळे धरण पायथा वीजगृह व दरवाजातून मिळून ५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. यामुळे कोयना नदीपातळीत वाढ झालेली. दोन दिवस हा विसर्ग सुरू होता. मात्र, त्यानंतर पाऊस कमी झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत गेली. परिणामी दरवाजे बंद करण्यात आले.

गुरुवारपासून कोयना धरणाच्या दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजातील विसर्ग पूर्णपणे थांबला आहे. तर सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २१०० क्युसेक पाणी सोडणे सुरू आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ३२१९२ क्युसेक पाण्याची आवक होत होती. तर धरण साठा १०३.३० टीएमसी झाला होता.

चौकट :

महाबळेश्वरला अल्प पाऊस...

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप आहे. पश्चिम भागात तर अल्प पर्जन्यमान होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ३ मिलिमीटर पाऊस पडला. तर जूनपासून आतापर्यंत ४१९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला १ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९६ तर, महाबळेश्वरला १ आणि जूनपासून ५५६६ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

.................................

प्रमुख धरणांतील विसर्ग असा...

मागील काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणात पाणी येत आहे. परिणामी धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये धोममधून ३७५ क्युसेक, कण्हेर २०५७, बलकवडी धरणातून ३०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तारळी, उरमोडी या धरणातून पाणी सोडणे बंद आहे.

........................................................