शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

छान नोकरी, मस्त छोकरी इतकीच अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गोड बोलून लग्न करून पुढं आयुष्यभर ऐकमेकांना दूषण देत, संसार करण्याचा काळ आता मागे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गोड बोलून लग्न करून पुढं आयुष्यभर ऐकमेकांना दूषण देत, संसार करण्याचा काळ आता मागे पडला आहे. छान नोकरी ही मुलींची आणि मस्त छोकरी ही मुलांची लग्न करण्यासाठीची टॅगलाइन झाली आहे. पटलं तर हो, नाहीतर गो, असं ठणकावून सांगणाऱ्या या पिढीने वादंग टाळण्यासाठी स्पष्ट मते मांडून सुखी संसार करण्याचं ठरविलं आहे.

प्रेमविवाहापेक्षाही ठरवून लग्न करण्याला तरुणाईची पसंती आहे. यासाठी रीतसर पत्रिका काढून कांदा पोहेचा कार्यक्रमही अनेकांनी अनुभवला आहे, पण आता मुलींनीच या गोष्टीला हरकत घेतली आहे. ऑनलाइन स्थळं बघून त्यातील जे पसंत आहेत, त्यांनाच घरी बोलावलं जाते. मुलींच्या मते, ‘स्थळ बघायला येणार म्हटलं की, आजूबाजूसह पै पाहुण्यांना याची माहिती दिली जाते. पहिले तीन-चार स्थळ बघेपर्यंत कोणी काही बोलत नाही, पण पाचहून अधिक स्थळ बघून गेल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण आणि लग्न ठरत नसल्याने नजरेत कीव अशा दोन्ही भावना डोकावतात. याची चर्चा होते ते आणि वेगळंच, म्हणूनच आपल्याच पसंतीचे स्थळ बोलविण्याला आम्ही प्राधान्य देतो.’

परदेशी जाणं रद्द, मग लग्नच नको!

लग्नानंतर परदेशी संसार थाटण्याची इच्छा मुलींमध्ये अधिक असते. त्यामुळे फॉरेनच्या मुलांना चांगलीच मागणी आहे. शहरातील एक किस्सा मात्र नवल करायला लावणारा आहे. कोविडमुळे परदेशी असणारा मुलगा साताऱ्यात आला. त्याच्या कंपनीनेही घरूनच काम करा, म्हणून सांगितलं. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि आपल्या देशात काम करायला अमाप संधी असल्याचं हेरून या तरुणाने भारतातच राहण्याचं ठरवलं. त्याचा हा निर्णय त्याच्या होणाऱ्या पत्नीला मान्य नव्हता. परिणामी, तिने हे लग्नच मोडले.

या अपेक्षांची पडली भर

खात्रीची नोकरी पाहिजे

व्यावसायिक शक्यतो नकोच

न्युक्लिअर कुटुंबाला पसंती

निर्व्यसनी असावा

या अपेक्षा झाल्या कमी

मोठ्या शहरातलंच स्थळ पाहिजे

दिसायला सुंदरच पाहिजे

मोठ्या कुटुंबातही संसाराची तयारी

नोकरी करणारी पत्नी असावी

कोट

महानगरांपेक्षाही निमशहरांमध्ये लग्न होऊन जाण्याची मानसिकता मुलींची दिसते. पूर्वीसारखं गोड गोड बोलणं आता कालबाह्य झालंय. आपल्या आवडी-निवडी आणि भविष्यातील अडचणींच्या चर्चा तरुणाई खूपच स्पष्टपणे करते.

- जयश्री शेलार, सोयरीक मंडळ, सातारा

मुली नोकरीसह देखणेपणाला तर मुलींचे शिक्षण मुलांसाठी अधिक महत्त्वाचं असते. पूर्वी मुलींना बघायला जाण्याचा ट्रेन्ड बदलला आहे. ऑनलाइन सर्फ करून योग्य वाटलेल्या स्थळाला भेटायला बोलावले जाते, तर मुलं मात्र थेट घरी जाऊन मुली बघण्याला प्राधान्य देतात.

- नीलेश शिंदे, मनमिलन मंडळ, सातारा.

मुलीचं सौंदर्य अन् मुलाचं कर्तृत्व याचीच चलती

पुरुषांचं सौंदर्य त्यांच्या कर्तृत्वात आणि महिलेचं कर्तृत्व तिच्या सौंदर्यात असं समीकरण लग्न जुळविताना पाहिलं जाते. लग्नासाठी मुलीच्या डिग्रीपेक्षा तिच्या सौंदर्याला महत्त्व दिले जाते, तर मुलाची नोकरी, त्याची सेटलमेंट याकडे मुलींचे लक्ष असते. सध्या अवघे २० टक्के मुलं आर्थिक स्वावलंबी आणि सक्षम आहेत. बाकीच्यांच्या बाबतीत अद्यापही स्थिरता न आल्याने, हे विवाहेच्छुक मुलींनी पसंत करावं, म्हणून थटून बसले असल्याचे विवाह मंडळ चालक सांगतात.