शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
3
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
4
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
7
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
8
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
9
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
10
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
11
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
12
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
13
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
14
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
15
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
16
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
17
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
18
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
19
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
20
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?

हद्दपार झाला छकडा.. अन् कोपऱ्यात हातगाडा!

By admin | Updated: November 30, 2015 01:18 IST

आधुनिकीकरणामुळे उपासमार : सातारा शहरात उरले फक्त चार गाडे

जावेद खान-- सातारा--स्वातंत्र्यपूर्व काळ आठवला तर त्यावेळी वाहतुकीच्या साधनांची फारशी सोय नव्हती. प्रवाशी वाहतुकीसाठी घोडागाडी अन् मालवाहतुकीसाठी हातगाड्या असायच्या. आता जमाना बदलला आहे. पूर्वी शान समजल्या जाणाऱ्या घोडागाड्या आता केवळ पर्यटनस्थळी रपेट मारण्यासाठी वापरल्या जात आहेत. आधुनिकीकरणामुळे छकडे हद्दपार झाले आहेत तर पूर्वी मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्याही कोपऱ्यात पडलेल्या पाहायला मिळत आहेत. ब्रिटिशकाळात साहित्यांची ने-आण करण्यासाठी हातगाडा, छकडा याशिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळातही हातगाडे, घोडागाडी बरीच वर्षे शहराच्या ठिकाणी पाहायला मिळत होती. मात्र वाहननिर्मिती क्षेत्रात वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी मालवाहतुकीबरोबरच प्रवाशी वाहतुकीच्या सोयीसाठी अनेक प्रकारची वाहने बाजारात आणली आहेत, ज्यामुळे काम सोपे झाले आहे. हातगाड्यांच्या जागी आता छोटी आधुनिक वाहने आली आहेत. त्यामुळे जुनी साधनं काळाच्या पडद्याआड चाललेली आहे.साताऱ्यात होते शेकडो हातगाडेब्रिटिशकाळापासून सातारच्या मुख्य बाजारपेठेत जवळपास शंभरहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्यांची संख्या होती. कामगार हातगाड्या, छकड्यांच्या साह्याने रात्रंदिवस काम करायचे. खासकरून बसस्थानक व रेल्वे स्थानकात हातगाडे दिसायचे. रोजगाराची ही मोठी केंद्रे असल्यामुळे मालवाहतूक करण्याची वर्दी हमखास मिळायची. कष्ट जास्त, मोबदला कमीसातारा शहराची भौगोलिक रचना चढ-उताराची आहे. अशा भागात हातगाडी चालविणे मोठे कष्टाचे असते. मात्र कष्टाच्या बदल्यात मिळणारा मोबदला फारच कमी असल्यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे अवघड असल्याचे चाळीस वर्षांपासून हातगाडा ओढण्याचे काम करणारे आनंद दोरके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बिले, परवाने देणे बंदपूर्वी वाहतूक शाखेकडून हातगाडाधारकांना बिले दिली जायची. त्याच्या नूतनीकरणाचा कालावधी २-३ वर्र्षाचा कालावधी होता. २० ते ३० रूपयांत हे नूतनीकरण होत होते. १९९५-९६ मध्ये हातगाड्यांचे शेवटचे नूतनीकरण झाले. तेव्हापासून बिले, परवाने देणे बंद झाले आहे.हातगाड्यांना अजूनही मागणीजवळची मालवाहतूक करण्यासाठी अजून हातगाड्यांना मागणी आहे. सातारा शहरात मजूर अड्ड्यावर काही हातगाडे पाहायला मिळतात. भाजीपाला, नारळाची पोती, गाद्या, टिकाऊ वस्तंूचे बॉक्स, बांधकामाचे स्टील, कपाटे अशा वस्तू दुकानातून घरापर्यंत नेण्यासाठी हातगाड्यांचा वापर होताना दिसतो. तसेच गोडावूनमधील माल दुकानापर्यंत नेण्यासाठीही हातगाडी वापरली जाते. कमी पैशात ही वाहतूक होत असल्याने आजही त्याला मागणी आहे.