शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

सगळ्यांना वाटतंय, ‘गुलाल आपलाच’

By admin | Updated: April 13, 2016 23:36 IST

चौकाचौकांमध्ये रंगल्या पैजा : पहिल्याच नगरपंचायतीत यश आपलेच हीच कार्यकर्ता अन् नेत्यांची भावना

राहीद सय्यद -- लोणंद --नगरपंचायत निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून, प्रत्येक प्रभागात दावे-प्रतिदाव्यांनी चुरस निर्माण झाली आहे. विजयाचे संकेत आपल्याच उमेदवाराकडे होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या चौदा उमेदवारांसह पुरस्कृत दोन उमेदवारांसाठी प्रचाराचे रान उठविले आहे. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या रणधुमाळीने लोणंद शहरात घडाळ्याचा गजर रात्रन्दिवस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या तालुक्यातील प्रमुखांनीही या निवडणुकीत झोकून दिल्याने पक्षाला प्रचारयंत्रणा राबविणे सोयीचे ठरत आहे.विरोधकांच्या प्रचारयंत्रणेवर नजर ठेवत आक्रमक भूमिका घेतल्याने कार्यकर्ते हातात हात घालून पक्षाचे बळ वाढवित आहेत. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्या सूत्रबद्ध प्रचार फेरीने उमेदवारांचे काम अधिक सोपे होत आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकीकडे लढाईचे रणांगण तापविले आहे. तर भाजपानेही मोजक्या ठिकाणी ताकद लावल्याचे दिसते; मात्र एरव्ही कणखर बाणा मिरवणाऱ्या शिवसेनेची मात्र तलवार म्यान झाली असल्याची चर्चा चौकाचौकांमध्ये ऐकायला मिळतेय. नेत्यांनीच पाठ फिरविल्याने उमेदवार वाऱ्यावर, अशी गत सेनेची झाली आहे. नवख्या भाजपाने मात्र लक्षवेधी लढत देण्याच्या इराद्याने रणनीती आखल्याचे पाहायला मिळतेय.वास्तविक, लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता पहिल्याच प्रयत्नात यावी, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी तळ ठोकल्याने विरोधकांची भंबेरी उडाली आहे. त्यांना तोंड देण्यासाठी काँगे्रसने जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील आणि अन्य नेत्यांना उतरवून आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. निवडणुकीतील प्रचार सभांपेक्षा पडद्यामागच्या हालचाली अधिक वेगाने आणि गुप्तरीत्या सर्वच पक्षांकडून सुरू आहेत. रात्रीच्या अंधारातील गुप्तगू दिवसा, उजेडीच्या प्रचाराची रणनीती ठरवून जाते आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपरिक लढतीत पहिल्यांदाच भाजप उतरल्याने कोणत्या प्रभागात भाजप किंवा अपक्ष उमेदवार किती मते घेणार, याची गणिते आत्ताच मांडली जाऊ लागली आहेत. त्यानुसार कोण विजयाकडे झुकणार, याचे कयास लावले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी चिखलफेक केल्याने नको एवढ्या गढूळ वातावरणात संध्याकाळच्या शीतल झुळकेत आपल्याच माणसांचा रुसवा काढण्यावर भर दिला जात आहे.प्रभागवार समस्या आणि घराघरांमध्ये शिरलेले राजकारण, भाऊबंदकीचा वाद, आणि जातीय समीकरणांनी आडाखे बांधले जात आहेत. शहरातील चौकाचौकांमध्ये एकोप्याने राजकीय चर्चा रंगविल्या जाऊन उमेदवारांचे भविष्य मांडले जात आहे. मात्र, खरा लेखाजोखा मतदारराजा आपल्या मतामधूनच व्यक्त करेल, हे मात्र निश्चित!अपक्षांचा दणकाप्रभाग क्र. १, ६, १२, १५ मध्ये प्रबळ अपक्षांनी दावेदारी केल्याने येथे कोणत्या पक्षाला दणका बसणार, यावर सत्तेची समीकरणे मांडली जात आहेत. त्या ठिकाणाच्या अपक्षांनी आपल्याच पक्षांना खुले आव्हान दिल्याने हा धक्का तारक की मारक काही दिवसांत स्पष्ट होईलच.