शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाश्रमातही आता लागली चक्क ‘वेटिंग लिस्ट’

By admin | Updated: December 7, 2015 00:30 IST

साताऱ्यात तब्बल पाच आश्रम : पेन्शनरांच्या सिटीत ‘वृद्धांची परस्पर सोय’ करण्याकडे वाढता कल

दत्ता यादव-- सातारा --एकेकाळी ‘पेन्शनरांची सिटी’ म्हणून कौतुकानं ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात सध्या पाचपेक्षाही जास्त वृद्धाश्रम ‘हाऊसफुल’ झाले आहेत. त्यामुळे या वृद्धाश्रमात बुकिंगसाठी चक्क ‘वेटिंग लिस्ट’ लागत आहेत. विशेष म्हणजे, गर्भश्रीमंतांच्या घरातले थकले जीवच मोठ्या संख्येने वृद्धाश्रमाच्या छायेत आयुष्याची सायंकाळ व्यतीत करीत आहेत. साताऱ्यातील ‘आनंदाश्रम’ येथे सुरुवातीच्या काळात दोन वृद्ध राहत होते. मात्र आता ही संख्या चाळीसवर पोहोचली आहे. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे नजीकच्या काळात वृद्धाश्रमांची व त्यामध्ये आश्रय घेणाऱ्या वृद्धांची संख्या वाढतच जाण्याची शक्यता आहे. आज केवळ मजबुरी म्हणून अनेक वृद्ध वृद्धाश्रमात राहत असले तरी उद्या ती एक पद्धतच होण्याची शक्यता आहे. भविष्यात नातवंडांना आजी-आजोबांना भेटायचे झाल्यास वृद्धाश्रमात जावे लागेल; मग ऋणानुबंध शोधावे लागतील, अशी परिस्थती येत्या काळात निर्माण होण्याची चिंता वृद्धाश्रम चालकांना लागली आहे. रोज कोणी ना कोणी नातेवाईक येऊन वृद्धाश्रमातील सुविधा आणि जागा उपलब्ध आहे का, याची विचारपूस करून जात आहेत. काही ठिकाणी तर क्षमतेपेक्षा जास्त वृद्ध राहत असल्यामुळे अनेकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. वृद्ध माणसं सुना-नातवंडांनाच नव्हे, तर जन्म दिलेल्या मुलांनाही नकोशी झाली आहेत. या सर्वाला एकच कारण म्हणजे दिवसेंदिवस भारतीय संस्कृतीमध्ये होत असलेले बदल कारणीभूत आहेत. माहिती तंत्रज्ञानातील बदलांप्रमाणे लोकांच्या विचारसरणीतही बदल होत आहेत. त्यातच पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण अशा विविध समस्यांमुळे घरातील कर्त्या पुरुषांनाही वृद्ध लोक अडगळीचे झाले आहेत. सून, मुलगा पटवून घेत नाहीत, अशा कारणाने वृद्ध लोक वृद्धाश्रमाच्या आश्रयाला जात आहेत. आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असलो तरी वृद्धांची ससेहोलपट काही थांबली नाही. दिवसेंदिवस आश्रमातील वृद्धांची संख्या वाढतच चालली असून, तिथेही त्यांना आता ‘प्रतीक्षा’ यादी आहे. ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्याकडूनच वृद्धांची उतारवयात परवड होत असल्याने वृद्धाश्रमातील गर्दी वाढत आहे. दोन पिढ्यांमधील सांस्कृतिक अंतर वाढत असल्याचेही अनेकांनी सांगितले. नातीच्या लग्नापुरते आजोबा घरात ! साताऱ्यातील एका वृद्धाश्रमात गेल्या काही वर्षांपासून एक गृहस्थ राहत आहेत. त्यांच्या मुलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्तम आहे. नातीचे लग्न करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी घरात कोण-कोण आहे, हे प्रश्न समोरून विचारले गेले. त्यावेळी वडील आश्रमात आहेत, हे नव्या पाहुण्यांना कसं सांगायचं. म्हणून लग्न सोहळा होईपर्यंत आजोबांना घरी नेण्यात आलं. दोन दिवसांनंतर त्यांना पुन्हा आश्रमात येऊन सोडण्यात आलं. मात्र, रक्तातीलच लोक अशा प्रकारे जर वृद्धांचा कामापुरता उपयोग करून घेत असतील तर हा समाज नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.............