शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रजोनिवृत्तीनंतरही ‘ती’ आई होणार

By admin | Updated: July 2, 2015 00:23 IST

पन्नाशीतील मातृत्व : माउली टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे यश

सातारा : आई होण्याची तारुण्यात अपुरी राहिलेली इच्छा उतारवयात पूर्ण करून घेण्याची संधी येथील एका महिलेला मिळाली आहे. रजोनिवृत्तीनंतर चार वर्षांनी या महिलेला गर्भ राहिला असून, माउली टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉ. रूपेश काटकर यांनी केलेल्या उपचारांना यश आले आहे.डॉ. काटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. पूनम विजय शिंदे (नाव बदलले आहे) या लग्नानंतर २६ वर्षांत एकदाच डॉक्टरची पायरी चढल्या होत्या, तेही गर्भ राहत नाही याच कारणासाठी. या कारणासाठी उपचार घेऊन काय उपयोग, असे जुन्या काळातील सासू-सासरे त्यांना नेहमी म्हणत असत. त्यातच वयाच्या ४६ व्या वर्षी पूनम यांना रजोनिवृत्ती आली. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान वापरून तारुण्यात अपत्यप्राप्ती होऊ शकते; पण पूनम यांना रजोनिवृत्तीही आली होती. त्यांचे वय ५० असताना त्यांच्यावर डॉ. काटकर यांनी उपचार सुरू केले. रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाचा आकार लहान होतो. त्यावर औषधोपचार करून गर्भाशय पूर्वस्थितीत आणण्यात त्यांनी आधी यश मिळविले. मासिक पाळी व्यवस्थित सुरू झाल्यानंतर जूनमध्ये टेस्ट ट्यूब तंंत्रज्ञान वापरण्यात आले. अधिक वयातही वंध्यत्वावर मात करून मातृत्व देणारी ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असून, मुंबईत जागतिक कीर्तीच्या मान्यवर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अभ्यासाचा या महिलेवर उपचार करताना उपयोग झाल्याचे डॉ. काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)