शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

साताऱ्यात कृषी विद्यापीठ स्थापन करा

By admin | Updated: June 17, 2014 00:47 IST

उदयनराजे भोसले : पुण्यातील बटाटा संशोधन केंद्राच्या स्थलांतराचीही मागणी

सातारा : ‘जैवविविधता, निसर्गसंपन्नता आणि दळवळणाच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गाने व्यापलेल्या सातारा जिल्ह्यात नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करावे. त्याचबरोबर पुणे येथे तात्पुरते स्थापन केलेले राष्ट्रीय खरीप बटाटा संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यात स्थलांतरित करावे,’ अशा दोन आग्रही मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांच्या कार्यक्षेत्राची विशाल व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनाने दोन्ही विद्यापीठांचे विभाजन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार राहुरीच्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी कोणत्या जिल्ह्यात विभाजनानंतरचे नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करावयाचे याबाबत निर्णय घेण्यासाठी डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती नेमलेली आहे. त्यानुसार नवीन कृषी विद्यापीठ सातारा जिल्ह्यात व्हावे, अशी आमची मागणी आहे. येथील माती आणि वातावरण विविधतेने नटलेले आहे. या ठिकाणी चांगले व पोषक वातावरण आहे. तसेच जिल्ह्यात विविध संशोधन केंद्रेही आहेत.त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील बटाट्याचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. येथील जमीन बटाटा पिकाला जोमदार आहे. त्यामुळे पुण्याला तात्पुरते सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय खरीप बटाटा संशोधन केंद्र जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात स्थलांतरित करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)