शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शहरात हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST

वाई : राज्यात पर्यावरण वातावरणातील बदल विभागामार्फत ऑक्टोबर २० ते मार्च २१ या सहा महिन्यांच्या कालावधीत माझी वसुंधरा अभियान ...

वाई : राज्यात पर्यावरण वातावरणातील बदल विभागामार्फत ऑक्टोबर २० ते मार्च २१ या सहा महिन्यांच्या कालावधीत माझी वसुंधरा अभियान राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्‍वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी विविध कामे करण्यात येत आहेत. वाई नगरपरिषदेमार्फत देखील या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शहरातील वायू गुणवत्ता नियंत्रणात राहण्यासाठी विविध उपाययोजना तसेच जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत वृक्षारोपण, सार्वजनिक उद्याने व विविध ठिकाणांचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, हवेच्या गुणवत्ता देखरेखीसाठी शहरात प्रणाली बसविणे, सायकल, ई-मोटार वाहन रॅली काढणे, शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात हरित आच्छादन वाढविणे, नाल्याच्या तोंडाशी जाळ्या बसविणे, पाण्याच्या स्त्रोतांचे इको रिस्टोरेशन करणे, नदीमध्ये ठिकठिकाणी इको ब्रिजेस बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

निसर्गाशी संबंधित असलेल्या या उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील वायू प्रदूषणाची तपासणी केली जात आहे. यासाठी वाई नगरपरिषदेमार्फत शहरात हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसविण्यात आली आहे. शहराचा निवासी भाग, बाजारपेठ भाग आणि घनकचरा प्रकल्प केंद्र अशा ३ ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे शहरातील प्रदूषणाचे मोजमाप करणे शक्य होणार असून, या यंत्रणेमुळे हवेत कोणकोणते प्रदूषणकारक घटक आहेत. त्यांचे प्रमाण किती आहे. याची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर हे घटक कोणत्या कारणामुळे हवेत येतात ही माहितीदेखील घेणे शक्य होणार आहे. या माहितीच्या मदतीने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे योजणार आहे. शहरातील हवेचा सुधारलेला पोत ही बाब समस्त वाईकरांसाठी आल्हाददायी ठरणार आहे. त्यासाठी नागरिकांनी देखील आपले योगदान देणे आवश्यक आहे.

(चौकट)

माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी वाई नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असून, वाईकरांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्यासाठी आणि शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

- विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी

फोटो २६वाई

वाई शहरातील वायू गुणवत्ता तपासणी यंत्रणासमवेत पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होेते.