शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

महामारीत हजारो लोकांचे पोट भरले; अनुदानदेखील वेळेत मिळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

सातारा : शंभर वर्षांनंतर जगात महामारी आली. या अदृश्य विषाणूबरोबर लढत असताना जनता अक्षरश: मेटाकुटीला आली होती. मात्र, राज्य ...

सातारा : शंभर वर्षांनंतर जगात महामारी आली. या अदृश्य विषाणूबरोबर लढत असताना जनता अक्षरश: मेटाकुटीला आली होती. मात्र, राज्य शासनाने गोरगरिबांसाठी मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याने गोरगरिबांचे पोट भरले, तसेच संबंधित केंद्र चालकांनादेखील वेळेत अनुदान दिल्याने त्यांनीसुद्धा उत्साहाने हे जेवण तयार केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जनता भरडली गेली. गोरगरिबांच्या हाताला काम राहिले नाही, दोन वेळेचे पोट कसे भरणार? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा हातभार लागला, तसेच दिलासा मिळाला. शिवभोजन केंद्र चालकांनी मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली. सोबतच प्रशासनानेदेखील त्यांची बिले तत्काळ मागून घेऊन अनुदानदेखील वेळेत वाटप केले, त्यानेदेखील उत्साहाने मोफत जेवण सुरू ठेवले आहे.

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे : ३०

आत्तापर्यंत किती जणांनी लाभ : २ लाख २० हजार

प्रतिथाळी चाळीस रुपये अनुदान

शहरी भाग ५० रु., ग्रामीण भाग ३५ रु. इतके प्रत्येक थाळीसाठी अनुदान आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोफत धान्य, तसेच मोफत जेवण शासनाच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे या सर्व बाबींचे शंभर टक्के अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

थाळी संख्याही वाढली आणि अनुदानही

शासनाने दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला. लाभार्थ्यांकडून एकही रुपया त्यासाठी घेतला जात नाही. मात्र, शासनाच्या वतीने शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जाते. मेअखेरपर्यंत शासनातर्फे अनुदानाचे वाटप झालेले आहे. जूनची बिले मिळाल्यानंतर सर्व अनुदान वाटप होणार आहे, अशी माहिती पुरवठा विभागातील अव्वल कारकून महेश गंगातीर्थकर यांनी दिली.

कोट...

शिवभोजन केंद्र चालकांकडून प्रत्येक महिन्याला बिले मागून घेतली जातात, शासनाकडूनदेखील वेळेत अनुदान उपलब्ध होत असल्याने त्यांना तत्काळ अनुदान वाटप केले जाते. शिवभोजन केंद्र चालकांनीदेखील मोलाचे सहकार्य केले असल्याने गोरगरिबांना शासनाच्या या योजनेचा अत्यंत चांगला फायदा होत आहे.

- स्नेहा किसवे देवकाते जिल्हा पुरवठा अधिकारी

कोट..

शासनाने शिवभोजनच्या माध्यमातून गोरगरिबांना सवलतीच्या दरात जेवण देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या पाच रुपयांत जेवण मिळत असल्याने गोरगरिबांची चांगली सोय झाली. आता तर पूर्णतः मोफत भोजन देण्यात येत आहे. शासनाकडून आमची बिले वेळेत मिळतात. बिलांच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही.

-राजू शेडगे, शिवभोजन केंद्र चालक

कोट..

जिल्हा पुरवठा विभागाने आम्हाला प्रत्येक वेळी प्रोत्साहित केले. अत्यंत गरीब नाही, तर ते मध्यम वर्गात लोक असतात, अशांच्या लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांनादेखील दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. आम्ही सुरुवातीपासूनच उत्साहाने या योजनेत सहभाग घेतला. शासनानेही आमच्या अनुदान वेळेत दिले.

-शिरीष बेंद्रे, शिवभोजन केंद्र चालक