शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पर्यावरणपूरक गणपती चळवळ घरोघरी पोहोचणे गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

वाई : ‘पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यांचे दुष्परिणाम संपूर्ण जगात दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येक माणसाचे ...

वाई : ‘पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यांचे दुष्परिणाम संपूर्ण जगात दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. आपले सण-समारंभ पर्यावरणपूरक असावेत, रोटरी क्लबने राबविलेले उपक्रम विधायक असून, पर्यावरणपूरक गणपती चळवळ घरोघरी पोहोचणे काळाची गरज आहे,’ असे मत डॉ. ओक यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ‘मीच बनवणार माझा इकोफ्रेंडली बाप्पा’ ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक बागडे, सचिव डॉ. प्रेरणा ढोबळे, डॉ. जितेंद्र पाठक, मदनकुमार साळवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपक बागडे म्हणाले, ‘पर्यावरण व पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नियंत्रण मंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, यासाठी शहरातील चिमुकल्यांनी मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या व अनेक गणपतीची रुपे साकारलेली आहेत.’ यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक मूर्ती बनवून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उपक्रमात डॉ. अनघा दातार व डॉ. मनोहर दातार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

यावेळी चिमुकल्यानी २५ हून अधिक शाडूच्या मातीपासून गणपती बनवले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा पोरे, तारका कांबळी, अर्चना पाठक, मंगला चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

२६वाई

रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ‘मीच बनवणार माझा इकोफ्रेंडली बाप्पा’ ही कार्यशाळा घेण्यात आली. (छाया : पांडुरंग भिलारे)