शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

फुटपाथवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST

सातारा : अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करूनही विक्रेते व व्यावसायिकांकडून रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. शहरातील राजवाडा, राजपथ, ...

सातारा : अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करूनही विक्रेते व व्यावसायिकांकडून रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. शहरातील राजवाडा, राजपथ, गोलबाल, मोती चौक, खणआळी या परिसरात अनेक विक्रेते व दुकानदारांकडून रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. काही विक्रेत्यांकडून राजपथावरील फुटपाथवर खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच हॉटेलचे फलक लावल्याने याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पाण्याचा अपव्यय

सातारा : सदर बजार, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व गोडोली आदी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणाकडून गळती काढण्याचे काम तातडीने केले जाते; परंतु बऱ्याचदा अवजड वाहनांमुुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. जीवन प्राधिकरणाने गळतीचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

प्लास्टिकचा बोलबाला

सातारा : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ही मोहीम बंद असल्याने व्यापारी, दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर करू लागले आहेत. पालिकेने शहरात पुन्हा एकदा कारवाई मोहीम राबविणे गरजेचे बनले आहे.

डुकरांचा सुळसुळाट

सातारा : शहरातील सदर बझार परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेत पालिकेने वराह पालन करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मोकाट डुकरे पकडली होती. मात्र, ही मोहीम थंडावल्याने सदर बझार, माची पेठ, केसरकर पेठ परिसरात डुकरांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने पुन्हा एकदा ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दुरुस्तीची मागणी

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे ढासळले असून, कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पावसामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटनाही सुरू झाल्या आहेत. हा धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

केळघर परिसरात डोंगरावर वणवा

वाई : वाई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डोंगरावर वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. या वणव्यामुळे निसर्गसंपदेसह सूक्ष्मजीवांची हानी होत असून वनवे लावल्यामुळे हिरवेगार डोंगर काळे पडू लागले आहेत. तसेच औषधी वनस्पती, झाडे तसेच सूक्ष्म जीवांचा बळी जात आहे. वन विभागाने याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे

वाहतुकीची कोंडी

सातारा : शहरातील तहसील कार्यालयासमोर वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी वाहने, रिक्षा, मालवाहतूक करणारी वाहने याच मार्गावरून ये-जा करतात. तर अनेक वाहनधारक रस्त्याकडेला तसेच दुकानांच्या समोर नो पार्किंगमध्ये वाहने लावत आहेत. पोलिसांच्या वतीने येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

वाहनधारकांत समाधान

सातारा : जुना मोटर स्टॅँड ते बुधवार नाका या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पालिकेकडून नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांसह व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.