शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

निवडणुका घ्यायला कर्मचारी मिळतायत, प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटपाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप ...

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप सुरू करण्याचे निर्देश पाळता येत नाहीत तर निवडणुका कशा काय घेतल्या जातात आणि यासाठी मनुष्यबळ कोठून व कसे आणले जाणार, असा सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी जिल्हा प्रशासनासमोर उभा केला आहे.

६०-६५ वर्षे उद्ध्वस्त केलेल्या कोयना धरणग्रस्तांनी लढून मिळवलेला विकसनशील पुनर्वसनाचा हक्क कोरोना महामारीच्या कारणाने अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवला जात आहे. कर्मचारी नाहीत म्हणून सांगितले जात आहे. मग कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीला कर्मचारी कसे काय उपलब्ध होणार आहेत. जर उपलब्ध होणारच असतील तर कोरोना महामारीचे काय असा सवाल प्रकल्पग्रस्त जनता विचारत आहे, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले आहे.

सातारा जिल्हाधिकारी यांनी ही कृष्णा कारखान्याची निवडणूक रद्द करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही आमचा सवाल आहे, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

खरे तर प्रकल्पग्रस्तांचे काम करणे हे कार्यालयात बसून गर्दी न करता करण्याचे काम आहे, यासाठी बाहेरून लोक किंवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावे लागणार नाहीत, असे असताना कोरोनाचे कारण देऊन हे काम थांबवले जाते, व दुसऱ्या बाजूला मात्र कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर करून ती घेण्याचा घाट घातला जातो हे कशाचे द्योतक आहे. या निवडणुकीत सभा होणार, मिरवणूक निघणार, पर्यायाने गर्दी होणार याला मात्र कोरोनाचे नियम लागू नाहीत, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि प्रकल्पग्रस्तांचे काम करताना कोरोना आढवा येतो याचे लॉजिक जनतेला समजले नाही, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

तुझे आम्हाला पत्र दिले तसे निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे का?

कोयना धरणग्रस्तांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दिलेले निर्देश पाळले जात नाहीत म्हणून कोयना धरणग्रस्त आपल्या गावागावात बेमुदत आंदोलन सुरु केले. त्याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना महामारीच्या कारणामुळे आंदोलनापासून परावृत्त व्हावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे पत्र आम्हाला दिले आहे. मग या निवडणुकीबाबत हे प्रशासन शासनाला पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याविषयी काही हालचाल केली आहे का? असाही सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.