शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

निवडणुका घ्यायला कर्मचारी मिळतायत, प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटपाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप ...

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप सुरू करण्याचे निर्देश पाळता येत नाहीत तर निवडणुका कशा काय घेतल्या जातात आणि यासाठी मनुष्यबळ कोठून व कसे आणले जाणार, असा सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी जिल्हा प्रशासनासमोर उभा केला आहे.

६०-६५ वर्षे उद्ध्वस्त केलेल्या कोयना धरणग्रस्तांनी लढून मिळवलेला विकसनशील पुनर्वसनाचा हक्क कोरोना महामारीच्या कारणाने अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवला जात आहे. कर्मचारी नाहीत म्हणून सांगितले जात आहे. मग कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीला कर्मचारी कसे काय उपलब्ध होणार आहेत. जर उपलब्ध होणारच असतील तर कोरोना महामारीचे काय असा सवाल प्रकल्पग्रस्त जनता विचारत आहे, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले आहे.

सातारा जिल्हाधिकारी यांनी ही कृष्णा कारखान्याची निवडणूक रद्द करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही आमचा सवाल आहे, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

खरे तर प्रकल्पग्रस्तांचे काम करणे हे कार्यालयात बसून गर्दी न करता करण्याचे काम आहे, यासाठी बाहेरून लोक किंवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावे लागणार नाहीत, असे असताना कोरोनाचे कारण देऊन हे काम थांबवले जाते, व दुसऱ्या बाजूला मात्र कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर करून ती घेण्याचा घाट घातला जातो हे कशाचे द्योतक आहे. या निवडणुकीत सभा होणार, मिरवणूक निघणार, पर्यायाने गर्दी होणार याला मात्र कोरोनाचे नियम लागू नाहीत, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि प्रकल्पग्रस्तांचे काम करताना कोरोना आढवा येतो याचे लॉजिक जनतेला समजले नाही, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

तुझे आम्हाला पत्र दिले तसे निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे का?

कोयना धरणग्रस्तांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दिलेले निर्देश पाळले जात नाहीत म्हणून कोयना धरणग्रस्त आपल्या गावागावात बेमुदत आंदोलन सुरु केले. त्याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना महामारीच्या कारणामुळे आंदोलनापासून परावृत्त व्हावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे पत्र आम्हाला दिले आहे. मग या निवडणुकीबाबत हे प्रशासन शासनाला पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याविषयी काही हालचाल केली आहे का? असाही सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.