शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मोहनराव कदमांच्या भेटीने कार्यकर्ते भावूक

By admin | Updated: November 15, 2016 00:26 IST

कवठेमहांकाळला बैठक : विधानपरिषद निवडणूक

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ -वेळ सायंकाळी साडेपाचची. कवठ्यात नगरपंचायतीचे वारे वाहू लागले असताना, जुन्या बसस्थानकावरून माणसांची ये-जा सुरू होती. काँग्रेसचे उमेदवारही दिवसभराचा प्रचार आटोपून काँग्रेस भवनात मतांची आकडेमोड करीत बसले होते. याचवेळी ज्येष्ठ नेते मोहनराव (दादा) कदम यांनी काँग्रेस भवनमध्ये अचानक प्रवेश केला आणि सगळेच अवाक् झाले. दादा आले आणि त्यावेळी बैठकीत रूपांतर कधी झाले, हे समजलेच नाही. बघता-बघता शेकडो कार्यकर्ते जमा झाले आणि दादांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. ‘हे बघा पोरांनो, मी राजकारणातील एक राजकीय मूर्तिकार म्हणून खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. या राजकारणात अनेक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर, सभापती, अध्यक्ष, राजकारणातील अनेक मातब्बर कार्यकर्ते, नेते घडविले आणि यात किती व कसा वेळ गेला समजलेच नाही. काम करीत राहिलो. खूप काम केले. काँग्रेस पक्षाने जी जी जबाबदारी आजवर दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. पण राजकारणातील रंगमंचावर मात्र मी उपेक्षितच राहिलोय रे! उपेक्षित हे समजायला अख्खे आयुष्य वेचावे लागले रे...’, असे म्हणत दादा खूपच भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि उपस्थित सर्वच शांत झाले.परत दादांनीच सर्वांना सावरत, ‘चालायचं राजकारणात’, म्हणत, ‘आपलं काम आहे जनतेची सेवा करायचं, ते करत राहायचं,’ म्हणत सुस्कारा सोडला. ‘बघू, आता माझी वेळ आली आहे. विधानपरिषदेसाठी सांगली, सातारामधून चांगला प्रतिसाद मिळतोय. माझ्यासारखा माणूस सर्वांना पाहिजे, अशी मतदारांची मागणी आहे. आजवर केलेल्या कामाची पोहोचपावती हे मतदार नक्की देतील. पक्ष बघणार नाहीत, माणूस बघतील’, असा विश्वासही दादांनी भावूक स्वरात व्यक्त केला. ‘सर्वत्र मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सगळ्यांनी मदत करण्याचं ठरवलं आहे. आजवर हा मोहनराव कदम सगळ्यांसाठी आधार झाला आहे. आता माझ्या लढाईत कोण-कोण साथ आणि सोबत राहतंय बघुया,’ असे सांगायला दादा विसरले नाहीत. जाता-जाता ते सगळ्यांनाच भावूक करून गेले.दादा असे सांगत असताना उपस्थित सर्वजण शांतपणे ऐकत होते. शेवटी दादांनीच निघण्याची परवानगी मागितली व त्यांच्या गाड्या सांगलीच्या दिशेने रवाना झाल्या.मोहनराव दादा गेल्यानंतर काँग्रेसची सर्वच मंडळी आणि उपस्थित कुजबुजू लागली. राजकारणात असा उदार मनाचा, खुल्या अंत:करणाचा माणूस होणार नाही. असा माणूस नक्कीच निवडून येईल, असा बोलबाला करीत सगळेजण परत प्रचाराला निघून गेले.यावेळी आप्पासाहेब शिंदे, सुरेश मोहिते, सतीश पाटील, बाळासाहेब गुरव, राजाराम घोरपडे, वैभव गुरव, दिलीप पाटील, चैतन्य पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ‘ कवठेमहांकाळ तालुका : माझे व्यक्तिगत संबंधकवठेमहांकाळ तालुक्याशी माझी पूर्वीपासून राजकीय, सामाजिक नाळ जोडली गेली आहे. माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे मला कवठेमहांकाळ तालुक्यातून नक्की मतदार न्याय देतील. मी आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात काम करीत असताना, माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांचा तसेच मदत मागणाऱ्या नेत्यांचा पक्ष बघितला नाही. येणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे कामे केली. नेत्यांनाही मदत केल्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही सर्व माणसे, नेते, कार्यकर्ते, मतदार माझ्या पाठीशी ढाल बनून थांबतील, असा विश्वास आहे’, असेही दादांनी सांगितले.