शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राजेंच्या साम्राज्यात आक्रमक चेहऱ्यांचा उदय- सातारा पालिकेचे राजकारण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:10 IST

सचिन काकडे ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वश्रूत आहे. मग जिल्ह्याचे राजकारण असो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे. आजपावेतो त्यांच्या आक्रमक शैलीची प्रचिती सातारकरांना अनेकदा आली आहे, असे असताना दुसरीकडे राजेंच्या पालिकेतील साम्राज्यातच अनेक आक्रमक चेहरे उदयास येऊ लागले आहेत. फोडाफोडीचे स्वर सर्वांच्या कानावर आदळू लागले आहेत.एकूणच कोणत्या न ...

ठळक मुद्देलुटूपुटूच्या लढाया थांबविण्याची सातारकरांची मागणी

सचिन काकडे ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वश्रूत आहे. मग जिल्ह्याचे राजकारण असो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे. आजपावेतो त्यांच्या आक्रमक शैलीची प्रचिती सातारकरांना अनेकदा आली आहे, असे असताना दुसरीकडे राजेंच्या पालिकेतील साम्राज्यातच अनेक आक्रमक चेहरे उदयास येऊ लागले आहेत. फोडाफोडीचे स्वर सर्वांच्या कानावर आदळू लागले आहेत.

एकूणच कोणत्या न कोणत्या कारणाने पालिकेचे राजकारण ढवळून निघत असताना, लुटूपुटूच्या लढाया थांबवा व शहराच्या विकासावर लक्ष केंद्रीत करा, असे सूरही सातारकरांमधून उमटू लागले आहेत.सातारा पालिकेत आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाची सत्ता होती. मात्र, २०१६ च्या निवडणुकीत मनोमिलनही तुटले. या निवडणुकीत खासदार उदयनराजे गटाच्या शिलेदारांनी नगराध्यक्षपदासह पालिकेचा गड काबीज केला. तर भाजपच्या सहा नगरसेवकांनी पालिकेत प्रवेश केला.

पालिकेत सातारा विकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे गटाच्या नगर विकास आघाडी व भाजप नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावे लागले. निवडणुकीनंतर दीड वर्षाच्या कालावधीत शहर विकासाच्या मुद्यावरून विरोधक व सत्ताधाºयांमध्ये शाब्दिक वाद नेहमीच पाहावयास मिळाले. सत्ताधाºयांची ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी आता विरोधकही भलतेच आक्रमक होऊ लागले आहेत. सभा वेळेत न घेणे, सभेची टिपण्णी न देणे, चर्चा न करता बहुमताने विषय मंजूर करणे अशा अनेक कारणांनी विरोधकांची कोंडी झाली आहे. याचे परिणाम पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले.

भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनी कामे न करणाºयांना दांडक्याने चोपण्याची भाषा केली. तर दुसरीकडे सर्वच विरोधकांनी सत्ताधाºयांविरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांच्या आक्रमक शैलीची झलक आज चक्क विरोधकांमध्ये दिसू लागली आहे. बंदूक काढण्यापासून ते दांडक्याने चोपण्यापर्यंतच्या गोष्टी पालिकेत घडू लागल्या आहेत. या सर्व घडामोडीने पालिकेचे राजकारण दूषित होत असतानाच सत्ताधारी व विरोधकांनी विकासावर लक्ष केंद्रीत करावे, असे सूर नागरिकांमधून उमटू लागले आहे.नगरविकास आघाडीचे मौन...धनंजय जांभळे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप ठेवून त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेतील कर्मचाºयांनीही या घटनेच्या निषेधार्थ कामबंदचे हत्यार उपसले. इतक्या घडामोडी होऊनही नगरविकास आघाडीने या घटनेचा निषेध न करता मौन धारण करणे पसंत केले. एकेकाळी शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक असलेल्या जांभळे यांना पालिकेचे तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये प्रवेश करून ते निवडून आले. या घडामोडी पाहता नगरविकास आघाडीची जांभळे यांना अंतर्गत फूस आहे की काय, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. 

शहर विकासासाठी मुख्यंमत्री, महसूल मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. कोट्यवधीचा निधी मंजूर केला. या निधीतून विकासकामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना सत्ताधारी अजेंड्यावर एकही विषय घेत नाही. उलट आमचा विश्वासघात करीत आहे. सातारा पालिका जिल्ह्याचं नाक आहे. या पालिकेचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा, परंतु इथेच मूलभूत समस्यांसाठी झगडावं लागत आहे. वारंवार मागणी करूनही नागरिकांची मुलभूत कामे मार्गी लागत नसतील तर आम्ही गप्प किती वेळ बसायचे.- धनंजय जांभळे, नगरसेवक, भाजप्सातारा शहराचा आणि प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा, ही खासदार उदयनराजे भोसले यांची अपेक्षा आहे. आमचा कोणालाही विरोध नाही. विरोधकांनी केवळ विषयाला धरून चर्चा करावी. सभा सुरू असताना प्रत्येक विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे, परंतु विषय मांडण्यापूर्वीच विरोधक गोंधळ घालतात. गत सभेच्या अजेंड्यावर विरोधकांचे विषय घेण्यात आले. मात्र त्यांनी सभात्याग केला. विरोधकांनी नियमबाह्य वागू नये.-स्मिता घोडके, गटनेत्या, साविआअनेक नगरसेवकांनी शहरात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे एकमेकांच्या उणिवा, बारकावे दोन्ही बाजूंना ज्ञात आहेत. पालिकेतील गोंधळामुळे शहराची प्रतिमा मलीन होत चालली आहे. आतापर्यंत जे झाले ते पुरे येथून पुढे दोन्ही आघाडीतील लोकप्रतिनिधी पदाधिकाºयांनी सामंज्याची भूमिका घ्यावी. विरोधकांनी व सत्ताधाºयांनी लुटूपुटूच्या लढाया थांबवून शहराच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे आहे.- शंकर माळवदे, माजी उपनगराध्यक्षधनंजय जांभळे यांनी पक्षाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करून आणला. मात्र, त्यांना त्यांच्याच वॉर्डातील कामांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मुख्याधिकारी अथवा सत्तारुढ आघाडी कोणतंही काम करायला तयार नाही. जनतेची कामे होत नसतील तर संताप व्यक्त करणे स्वाभाविकच आहे. नगराध्यक्षांना जनतेने निवडून दिले आहेत. मात्र, त्यांनाच जनतेच्या मुलभूत कामांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.- अशोक मोने, विरोधी पक्ष नेता, नविआा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण