शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

राजेंच्या साम्राज्यात आक्रमक चेहऱ्यांचा उदय- सातारा पालिकेचे राजकारण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:10 IST

सचिन काकडे ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वश्रूत आहे. मग जिल्ह्याचे राजकारण असो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे. आजपावेतो त्यांच्या आक्रमक शैलीची प्रचिती सातारकरांना अनेकदा आली आहे, असे असताना दुसरीकडे राजेंच्या पालिकेतील साम्राज्यातच अनेक आक्रमक चेहरे उदयास येऊ लागले आहेत. फोडाफोडीचे स्वर सर्वांच्या कानावर आदळू लागले आहेत.एकूणच कोणत्या न ...

ठळक मुद्देलुटूपुटूच्या लढाया थांबविण्याची सातारकरांची मागणी

सचिन काकडे ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वश्रूत आहे. मग जिल्ह्याचे राजकारण असो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे. आजपावेतो त्यांच्या आक्रमक शैलीची प्रचिती सातारकरांना अनेकदा आली आहे, असे असताना दुसरीकडे राजेंच्या पालिकेतील साम्राज्यातच अनेक आक्रमक चेहरे उदयास येऊ लागले आहेत. फोडाफोडीचे स्वर सर्वांच्या कानावर आदळू लागले आहेत.

एकूणच कोणत्या न कोणत्या कारणाने पालिकेचे राजकारण ढवळून निघत असताना, लुटूपुटूच्या लढाया थांबवा व शहराच्या विकासावर लक्ष केंद्रीत करा, असे सूरही सातारकरांमधून उमटू लागले आहेत.सातारा पालिकेत आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाची सत्ता होती. मात्र, २०१६ च्या निवडणुकीत मनोमिलनही तुटले. या निवडणुकीत खासदार उदयनराजे गटाच्या शिलेदारांनी नगराध्यक्षपदासह पालिकेचा गड काबीज केला. तर भाजपच्या सहा नगरसेवकांनी पालिकेत प्रवेश केला.

पालिकेत सातारा विकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे गटाच्या नगर विकास आघाडी व भाजप नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावे लागले. निवडणुकीनंतर दीड वर्षाच्या कालावधीत शहर विकासाच्या मुद्यावरून विरोधक व सत्ताधाºयांमध्ये शाब्दिक वाद नेहमीच पाहावयास मिळाले. सत्ताधाºयांची ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी आता विरोधकही भलतेच आक्रमक होऊ लागले आहेत. सभा वेळेत न घेणे, सभेची टिपण्णी न देणे, चर्चा न करता बहुमताने विषय मंजूर करणे अशा अनेक कारणांनी विरोधकांची कोंडी झाली आहे. याचे परिणाम पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले.

भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनी कामे न करणाºयांना दांडक्याने चोपण्याची भाषा केली. तर दुसरीकडे सर्वच विरोधकांनी सत्ताधाºयांविरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांच्या आक्रमक शैलीची झलक आज चक्क विरोधकांमध्ये दिसू लागली आहे. बंदूक काढण्यापासून ते दांडक्याने चोपण्यापर्यंतच्या गोष्टी पालिकेत घडू लागल्या आहेत. या सर्व घडामोडीने पालिकेचे राजकारण दूषित होत असतानाच सत्ताधारी व विरोधकांनी विकासावर लक्ष केंद्रीत करावे, असे सूर नागरिकांमधून उमटू लागले आहे.नगरविकास आघाडीचे मौन...धनंजय जांभळे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप ठेवून त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेतील कर्मचाºयांनीही या घटनेच्या निषेधार्थ कामबंदचे हत्यार उपसले. इतक्या घडामोडी होऊनही नगरविकास आघाडीने या घटनेचा निषेध न करता मौन धारण करणे पसंत केले. एकेकाळी शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक असलेल्या जांभळे यांना पालिकेचे तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये प्रवेश करून ते निवडून आले. या घडामोडी पाहता नगरविकास आघाडीची जांभळे यांना अंतर्गत फूस आहे की काय, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. 

शहर विकासासाठी मुख्यंमत्री, महसूल मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. कोट्यवधीचा निधी मंजूर केला. या निधीतून विकासकामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना सत्ताधारी अजेंड्यावर एकही विषय घेत नाही. उलट आमचा विश्वासघात करीत आहे. सातारा पालिका जिल्ह्याचं नाक आहे. या पालिकेचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा, परंतु इथेच मूलभूत समस्यांसाठी झगडावं लागत आहे. वारंवार मागणी करूनही नागरिकांची मुलभूत कामे मार्गी लागत नसतील तर आम्ही गप्प किती वेळ बसायचे.- धनंजय जांभळे, नगरसेवक, भाजप्सातारा शहराचा आणि प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा, ही खासदार उदयनराजे भोसले यांची अपेक्षा आहे. आमचा कोणालाही विरोध नाही. विरोधकांनी केवळ विषयाला धरून चर्चा करावी. सभा सुरू असताना प्रत्येक विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे, परंतु विषय मांडण्यापूर्वीच विरोधक गोंधळ घालतात. गत सभेच्या अजेंड्यावर विरोधकांचे विषय घेण्यात आले. मात्र त्यांनी सभात्याग केला. विरोधकांनी नियमबाह्य वागू नये.-स्मिता घोडके, गटनेत्या, साविआअनेक नगरसेवकांनी शहरात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे एकमेकांच्या उणिवा, बारकावे दोन्ही बाजूंना ज्ञात आहेत. पालिकेतील गोंधळामुळे शहराची प्रतिमा मलीन होत चालली आहे. आतापर्यंत जे झाले ते पुरे येथून पुढे दोन्ही आघाडीतील लोकप्रतिनिधी पदाधिकाºयांनी सामंज्याची भूमिका घ्यावी. विरोधकांनी व सत्ताधाºयांनी लुटूपुटूच्या लढाया थांबवून शहराच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे आहे.- शंकर माळवदे, माजी उपनगराध्यक्षधनंजय जांभळे यांनी पक्षाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करून आणला. मात्र, त्यांना त्यांच्याच वॉर्डातील कामांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मुख्याधिकारी अथवा सत्तारुढ आघाडी कोणतंही काम करायला तयार नाही. जनतेची कामे होत नसतील तर संताप व्यक्त करणे स्वाभाविकच आहे. नगराध्यक्षांना जनतेने निवडून दिले आहेत. मात्र, त्यांनाच जनतेच्या मुलभूत कामांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.- अशोक मोने, विरोधी पक्ष नेता, नविआा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण