शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

कोयना धरणग्रस्तांचा पुनर्वसनासाठी एल्गार,साताºयात मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू; ५८ वर्षांपासूनचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:38 IST

सातारा : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांचे ५८ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे.

सातारा : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांचे ५८ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. कोयना धरणग्रस्तांची प्रदीर्घ ससेहोलपट थांबवून त्यांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याचा वेगवान कालबद्ध कार्यक्रम तातडीने आखून त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसह इतर मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोयना धरणग्रस्तांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सोमवारी धरणग्रस्तांनी बोगद्यापासून मोर्चाला सुरुवात केली. तिथून राजवाडा, पोलिस अधीक्षक कार्यालय, पोवईनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना याआधीच निवेदन सादर केले होते. त्याबाबत बैठकाही झाल्या होत्या. त्यात मिळालेली आश्वासने पूर्ण करण्यात आली नसल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये हजारो धरणग्रस्त सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्राच्या वीज पुरवठ्यात आणि त्याचमुळे औद्योगिक आणि कृषी विकासात कळीची आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ५८ वर्षे उलटून गेली तरी प्रलंबित आहे. कोयना धरणग्रस्तांची ही प्रदीर्घ ससेहोलपट थांबवून त्यांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याचा वेगवान कालबद्ध कार्यक्रम आखावा, धरणग्रस्तांवर पुन्हा एकदा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित होण्याची वेळ आली. त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रियासुद्धा अकारणच प्रलंबित राहत आहे. काही गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दा संबंधित विभागाच्या खिजगिणतीतच नाही. ही पुनर्वसन प्रक्रिया वेगवान करून त्यांचेशंभर टक्के पुनर्वसन करण्यात यावे, कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कोअरमधील पर्यावरण विकास कमिट्या संबंधित गावांमधील जनतेच्या निर्णयाने आणि त्यांनी कायद्याच्या कक्षेत तयारकेलेल्या आराखड्याप्रमाणे चालल्या पाहिजेत. पण तसे न होता संबंधित निधी पडूनच राहत आहे.त्यासंदर्भात ठोस निर्देश देऊन गावांच्या विकासाची वाट मोकळी करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.डॉ. भारत पाटणकर इतर प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चेला गेले होते. त्यामुळे कॉ. संपत देसाई, हरिश्चंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर, डी. के. बोडके, चैतन्य दळवी यांच्या उपस्थित धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या मांडून बसले आहेत.या आहेत प्रमुख मागण्या...कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी व मंत्रालयाच्या ठिकाणी वॉर रूम तयार कराव्यातराष्ट्रीय भूसंपादन कायद्याच्या सर्व तरतुदी लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी६०-६५ वर्षे पुनर्वसन रखडल्याने या प्रकल्पांना दरमहा १५ हजार भत्ता व जमीन देण्यात यावी