शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

दिल्लीतील किसान आंदोलनात मराठी महिला शेतकऱ्यांचा एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

सातारा : दिल्लीतील किसान आंदोलनात महाराष्ट्रातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. लोकसंघर्ष मोर्चा व लेक लाडकी अभियान ...

सातारा : दिल्लीतील किसान आंदोलनात महाराष्ट्रातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. लोकसंघर्ष मोर्चा व लेक लाडकी अभियान या दोन संस्थांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने हा जत्था आयोजित केला आहे.

या जथ्याने १५ जानेवारी रोजी दिल्लीकडे कूच केले व १७ जानेवारीपासून हा जत्था दिल्लीतील आंदोलनात सामील झाला आहे. १८ जानेवारी हा महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. यामध्ये महाराष्ट्रातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा यांच्या नावाचा जयघोष करत सहारनपूर बॉर्डर दणाणून सोडली.

महाराष्ट्राचा पारंपरिक वेष परिधान करून महिला वाद्यांच्या ताला-ठेकात आंदोलनस्थळी फेरीने पोहोचल्या. या पूर्ण कार्यक्रमात राजस्थान, हरयाणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब येथील ३ हजार महिला शेतकरी सामील झाल्या होत्या.

कार्यक्रमामध्ये प्रतिभा पाटील, अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांची भाषणे झाली. यामध्ये प्रतिभा शिंदे यांनी शेतीमधल्या महिलांच्या योगदानाबद्दल तसेच शेतीसंबंधी होणाऱ्या चर्चेत, निर्णयात महिलांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आणि शेतकरी महिलांच्या व्यथा आणि त्यांचा राग मांडला. वर्षा देशपांडे यांनी शेतीची सुरुवात कशाप्रकारे महिलांनी केली हे सांगितले आणि महिलांची ताकद सरकारने समजून घ्यावी, नाही तर त्याची सरकारला किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशारा दिला.

कार्यक्रमावेळी सामूहिकरीत्या ठराव मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तीनही काळे कायदे रद्द होईपर्यंत लढाई सुरू ठेवण्याचा ठराव त्यांनी मांडला. त्याचप्रमाणे सर्व शेतकरी महिला व पुरुषांनी संघटितपणे आंदोलनाच्या शेवटपर्यंत व आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सोबत राहण्याचा निर्धार या ठरावात केला. आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण प्रतिनिधित्व देशातील विविध भागांतून आलेल्या महिलांद्वारे करण्यात आले.

चौकट :

बाण रोवून शुभेच्छा

दिल्लीत कडाक्याच्या थंडीत सलग दोन महिने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून महिलांनी जाण्याचा हिय्या केला. गनिमी काव्याने आंदोलनस्थळावर पोहोचल्यानंतर महिला या आंदोलनात सहभागी झाल्या. महिला किसान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या ५ महिलांच्या हस्ते जमिनीमध्ये बाण रोवून सांकेतिक पद्धतीने उद्‌घाटन करून पाठिंबा दर्शविला.