शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

By प्रमोद सुकरे | Updated: December 10, 2022 19:11 IST

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक 

प्रमोद सुकरेकऱ्हाड : थेट सरपंच निवडणुकीमुळे यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत भलतीच रंगत आली आहे. ज्या गावात सरपंच पद खुले आहे तेथे तर अटितटीची लढत पाहायला मिळतेय. या साऱ्याला छेद देत कऱ्हाड तालुक्यातील गोंदी गावात मात्र राजकारण गुण्यागोविंदाने नांदताना पाहायला मिळाले. सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असतानाही २० वर्षानंतर पुन्हा एकदा या गावची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यांचे कौतुक तर सगळीकडे होणारच!कराड तालुक्यातील गोंदी ची  बागायतदारांचे गाव म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथे आर्थिक सुबत्ता चांगलीच आहे. तसेच राजकीय दृष्ट्याही हे गाव तितकेच संवेदनशील आहे. म्हणून तर या गावातील लोकांनी आजवर पंचायत समिती, कृष्णा सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी बँक, कृष्णा कृषी उद्योग संघ,कराड तालुका खरेदी विक्री संघ, कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे तर आजही काहीजण करीत आहेत.सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेले गोंदी हे गाव आहे. ऊसाच्या शेतीमुळे येथे आर्थिक समृद्धी चांगलीच आहे. त्याचबरोबर राजकारणही तेवढेच समृद्ध असल्याची प्रचिती बिनविरोध निवडणुकीमुळे आली आहे. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले,काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,अँड. उदयसिंह पाटील - उंडाळकर,राष्ट्रवादीचे नेते, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते या सगळ्यांचे समर्थक या गावात आहेत.त्यातच सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी पडल्याने या गावची निवडणूकही अटितटीची होईल अशी चर्चा होती. मात्र ऊसाबरोबर इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या या गावात यावेळी इंद्रायणीचाच सुवास पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधचा डंका पाहिला मिळाला. खरंतर ही बाब इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी, आणि अनुकरणीय आहे.

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक गोंदी गावची निवडणूक २० वर्षांपूर्वी अशीच एकदा बिनविरोध झाली होती. त्यावेळी दिवंगत तानाजी पवार हे बिनविरोध सरपंच झाले होते. त्यावेळी देखील गोंदी ची निवडणूक बिनविरोध कशी काय झाली? याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. पण पुन्हा एकदा ग्रामस्थांनी एकजूट दाखवून बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा नवा इतिहास रचला आहे.असे आहेत नवे शिलेदारसरपंच- सुबराव पवारसदस्य- शरद पवार ,वैशाली यादव, वनिता पवार, रमेश पवार, अरुणा माने, अजित कुंभार ,रमेश पवार, जयाताई मदने, प्रज्ञा बनसोडे

ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला बिनविरोध निवडून दिले आहे .याची आम्हाला जाणीव आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन आदर्श कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. - सुबराव पवार, सरपंच गोंदी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकKaradकराड