शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

मुख्यमंत्रिपदी शिंदेच, अजित पवारांना लवकर संधी नाही; रामदास आठवलेंचा दावा

By नितीन काळेल | Updated: April 27, 2023 19:55 IST

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होऊन सत्ता मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला

सातारा : ‘अनेकांची इच्छा मुख्यमंत्री होण्याची असते. तसेच अजित पवारांनी व्यक्त केली. भाजपबरोबर ते आलेतरी त्यांना लवकर मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटत नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील,’ असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच टांगती तलवार शिंदे यांच्यावर नाहीतर उध्दव ठाकरे यांच्यावर असल्याचा दावाही त्यांनी केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले, ‘‘रिपाइं’चे अधिवेशन २८ मे रोजी शिर्डी येथे होणार आहे. देशातून ५० हजार कार्यकर्ते येतील असे नियोजन आहे. यामध्ये नागालॅंडमधील आमच्या पक्षाचे दोन आमदारही सहभागी होतील. देशात पक्षवाढीवर भर देण्यात येणार आहे. अधिवेशनात भूमिहीन कुटुंबांना पाच एकर जमीन द्यावी अशी आमची मागणी राहणार आहे. कारण, शहराकडे येणारे लोंढे थांबतील. गावातील माणूस गावातच राहील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील गावी आले होते. ते सुट्टीवर आले नव्हते. तर शेती पाहणे, कुटुंबाला भेटण्यासाठी आलेले असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे. तसाच सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल मेरीटवर लागेल. कारण, ७५ टक्के आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे आहेत. उध्दव ठाकरे यांनी आमदारांची कामेच केली नाहीत. कोरोना काळात त्यांना भेटलेही नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होऊन सत्ता मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे राहणार असतील तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लागल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर मंत्री आठवले यांनी अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आघाडी असताना राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते. तेव्हा त्यांना संधी होती. पण, मुख्यमंत्री होता आले नाही. शरद पवार यांच्या तालमीत अजित पवार तयार झालेले आहेत. ते आमच्या महायुतीत आलेतर आनंद आहे. पण, मुख्यमंत्री हे शिंदेच राहतील. कारण, अजित पवार यांना लवकर संधी मिळणार नाही, असे वाटते.

एकनाथ शिंदेंचे महाबंड; राऊतांच्या भूलथापा...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. पण, त्याप्रमाणात अधिक मते मिळत नव्हती. शिवसेनेत आतापर्यंत अनेकवेळा बंड झाले. पण, ते तेवढ्यापुरते मर्यादित होते. एकनाथ शिंदे यांचे हे महाबंड आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांच्या भूलथापांना बळी पडून उध्दव ठाकरे हे आघाडीत गेले, असा दावाही त्यांनी केला.

राज ठाकरेंनी स्वतंत्र राहणे फायद्याचे...मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास विरोध का ? या प्रश्नावर आठवले यांनी स्वतंत्र राहिल्यावर भाषण करण्याची संधी मिळते. ते त्यांच्या फायद्याचेच आहे. त्यांची आवश्यकता आम्हाला नाही. माझा पक्ष युतीत असताना ते नकोत, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार