शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

एकीकडं निसर्गपूजा तर दुसरीकडं होळी!

By admin | Updated: March 18, 2016 23:57 IST

डोंगर पेटले : पाटण तालुक्यातील वनसंपदा होतेय खाक; पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता

पाटण : ‘निसर्गाचा नाश झाला की मानवाचा आपोपच नाश होतो,’ असं म्हटलं जातं. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून शासकीय यंत्रणा व काही निसर्गप्रेमी झटत आहेत. जेजुरीहून काही मंडळी येऊन काऊदऱ्यावर निसर्ग पूजा करून गेले. एकीकडे हे विधायक काम दिसत असतानाच काही विघ्नसंतोषी मंडळी वणवे लावून डोंगरच्या डोंगर पेटवून देत आहेत. वनांची चाललेली होळी पाहावत नाही.निसर्गपूजा ही खरोखरच एक आगळीवेगळी घटना आहे. यातून हरितसंपत्ती जपण्याचे संस्कार भावी पिढीवर होत असतो; पाटण तालुक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. कोयना धरणामध्ये अमृतासमान भव्यदिव्य जलाशय आहे. हे सांभाळण्यासाठी वन्यजीव आणि वन्यविभाग आहे. मात्र निसर्गाचे जतन करण्यासाठी हवा तेवढा लोकसहभाग दिसून येत नाही. काही विघ्नसंतोषी मंडळी क्षणिक आनंदासाठी किंवा गैरसमजुतीतून जंगले पेटवून देत आहेत. यामध्ये दुर्मीळ वनौषधी, जीव-जंतू जळून खाक होत आहेत. या मंडळींच्या वक्रदृष्टीतून जंगलांना वाचविण्यासाठी कायद्याचा धाक आणि कठोर कारवाई होण्याची गरज आहे. गावोगावच्या नवसंरक्षण समित्या निर्दिस्त झाल्यासारख्या आहेत. त्यामुळे गावागावांतील जंगल, डोंगर रात्रंदिवस वणव्याने करपून निघत आहेत. मात्र, हा प्रकार कोणाच्याच लक्षात येत नाही.मोरणा विभागातील पवनचक्क्यांनी डोंगर, आसपासचे जंगल व्यापले आहे. तर कोयनेकडील घाटमाथा, नवजा हा अभयारण्य घोषित परिसर दिवसाढवळ्या राखरांगोळी होताना पाहावत नाही. वनविभाग एकीकडे वृक्षलागवडीसाठी तयारीत असताना दुसरीकडे वणव्यात हजारो लहान-मोठी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत. यावर गांभीर्याने विचार होत नाही. वृक्षलागवडीसाठी शासनाचे अनुदान, लाखोंचा पैसा खर्च होतो. त्यात वनकर्मचारी उत्साह दाखवितात; मात्र वणवे विझविण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत. एखाद्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मंडळी पुढे-पुढे जाऊन टेंभा मिरवत असतात. त्याचप्रमाणे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वणवा उपग्रहावरकोयना व चांदोली अभयारण्यांत आता वणवा लागला गेल्यास उपग्रहाद्वारे तत्काळ दिल्ली येथील वन्यजीव विभागाकडे संदेश जातो. उपग्रहाद्वारे वणवा नेमका कोठे लागला, हे कळते. त्यानंतर हालचाली घेऊन वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केला जातो.मोरगिरी वनक्षेत्रात वणवा लागण्याच्या दोन घटना घडल्या; मात्र वनक्षेत्रापेक्षा खासगी डोंगरांना वणवा लागल्याचे प्रकार जास्त घडत आहेत. वनविभाग किंवा वनीकरणातर्फे वृक्षलागवड केलेले क्षेत्र आहेत. तिथेच जाळरेषा आखल्या आहेत. यापद्धतीने ग्रामस्थांनी सर्वच डोंगरांना जाळरेषा आखाव्यात.- व्ही. आर. काळे, वनक्षेत्रपाल, पाटण