शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
4
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
7
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
8
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
9
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
12
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
13
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
14
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
15
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
16
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
17
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
18
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
19
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
20
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल महागच; कांदा दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून अजूनही उतार आलेला नाही, तर दुसरीकडे पालेभाज्या स्वस्तच आहेत. फक्त ...

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून अजूनही उतार आलेला नाही, तर दुसरीकडे पालेभाज्या स्वस्तच आहेत. फक्त वाटाणा भाव खाऊ लागला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव मिळू लागलाय. त्याचबरोबर कांदा दरात थोडी सुधारणा आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यांतूनही काही माल येत असतो. मागील काही दिवसांत आवक कमी झाली आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी ९३३ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांदा ३०५, बटाटा १७५, लसूण १६ आणि आल्याची ६ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, चिकू, कलिंगड यांची आवक झाली. द्राक्षे आणि खरबुजाची आवक थांबली आहे.

सोयाबीन तेल दरात वाढ

खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे शेंगदाणा व सूर्यफूल तेलाचा ग्राहक सोयाबीनकडे काही प्रमाणात वळला आहे. सोयाबीन तेल दर वाढला आहे. सोयाबीनचा डबा २३५० ते २४५० पर्यंत मिळत आहे. पामतेल २२००, सूर्यफूल २६०० ते २७०० आणि शेंगदाणा तेल डबा २७०० ते २८०० पर्यंत मिळत आहे.

आंब्याची आवक टिकून

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, आवक होत आहे. या रविवारी आंब्याची ७१ आणि कलिंगडाची १५ क्विंटलची आवक झाली. आंब्याची आवक टिकून आहे.

गवारीची आवक

बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला १०० ते १२०, गवार आणि दोडका ३०० ते ४००, मिरचीला २०० ते २५० रुपये दर १० किलोला मिळाला. तसेच कांद्याला क्विंटलला १४०० तर लसणाला ८ हजारांपर्यंत दर मिळाला. दरात सुधारणा झाली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे मंडया बंद आहेत. भाजीपाला कोठूनतरी गुपचूप खरेदी करावा लागतो. पेठेत विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. मंडईपेक्षा दर अधिक असतो.

- राकेश पवार, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. अजून काही दिवस खाद्यतेलाचे दर तेजीतच राहतील.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघणार का, हा प्रश्न आहे.

- शांताराम पाटील, शेतकरी