शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल महागच; कांदा दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून अजूनही उतार आलेला नाही, तर दुसरीकडे पालेभाज्या स्वस्तच आहेत. फक्त ...

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून अजूनही उतार आलेला नाही, तर दुसरीकडे पालेभाज्या स्वस्तच आहेत. फक्त वाटाणा भाव खाऊ लागला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव मिळू लागलाय. त्याचबरोबर कांदा दरात थोडी सुधारणा आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यांतूनही काही माल येत असतो. मागील काही दिवसांत आवक कमी झाली आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी ९३३ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांदा ३०५, बटाटा १७५, लसूण १६ आणि आल्याची ६ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, चिकू, कलिंगड यांची आवक झाली. द्राक्षे आणि खरबुजाची आवक थांबली आहे.

सोयाबीन तेल दरात वाढ

खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे शेंगदाणा व सूर्यफूल तेलाचा ग्राहक सोयाबीनकडे काही प्रमाणात वळला आहे. सोयाबीन तेल दर वाढला आहे. सोयाबीनचा डबा २३५० ते २४५० पर्यंत मिळत आहे. पामतेल २२००, सूर्यफूल २६०० ते २७०० आणि शेंगदाणा तेल डबा २७०० ते २८०० पर्यंत मिळत आहे.

आंब्याची आवक टिकून

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, आवक होत आहे. या रविवारी आंब्याची ७१ आणि कलिंगडाची १५ क्विंटलची आवक झाली. आंब्याची आवक टिकून आहे.

गवारीची आवक

बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला १०० ते १२०, गवार आणि दोडका ३०० ते ४००, मिरचीला २०० ते २५० रुपये दर १० किलोला मिळाला. तसेच कांद्याला क्विंटलला १४०० तर लसणाला ८ हजारांपर्यंत दर मिळाला. दरात सुधारणा झाली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे मंडया बंद आहेत. भाजीपाला कोठूनतरी गुपचूप खरेदी करावा लागतो. पेठेत विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. मंडईपेक्षा दर अधिक असतो.

- राकेश पवार, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. अजून काही दिवस खाद्यतेलाचे दर तेजीतच राहतील.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघणार का, हा प्रश्न आहे.

- शांताराम पाटील, शेतकरी