शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

गावोगावी उपमार्गाला समस्यांचे ग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन २००६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ...

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन २००६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर काही दिवसातच सेवा रस्त्यावर वाहनचालकांना विशेषत: दुचाकी चालकांना येणाऱ्या अडचणी, सेवा रस्ते करताना झालेल्या चुका समोर आल्या होत्या. दरवर्षी पावसाळ्यात तीन ते चार महिने सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहात असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. आटके, नांदलापूर, मलकापूर, गोटे, खोडशी, वहागाव परिसरात सेवा रस्त्यावर पाणी साचून राहते. यावर्षी १६ जूनला चक्क पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे आणि खोडशी गावच्या हद्दीत पाच ते सहा फुटाहून अधिक पाणी साचले होते.

सेवा रस्त्यावरील वाहतूक आजवर ठप्प होत होती आणि यंदा सेवा रस्ताच काय तर महामार्गही पाण्यात होता. पहाटेच्यावेळी अंदाज न आल्याने इचलकरंजी येथील एका युवकाची कार या पाण्यात वाहून गेली. यापूर्वीही सेवा रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळेच महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यांवरील सोयी-सुविधांबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- चौकट

जिथे ओढे आहेत तिथेच रस्ता केला खोल

ओढ्याचे पाणी सेवा रस्त्यावर साचू नये, यासाठी सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. मोऱ्यांच्या दोन्ही बाजूला रस्ता खोल करण्यात आल्याने आणि सेवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे ओढे असणाऱ्या ठिकाणी रस्ते का उंच करण्यात आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.