शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

चिंचणीत पिकाची ई-पीक नोंदणी प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST

कुडाळ : नांदगणे ते पुनवडीदरम्यानचा पूल वाहून गेल्याने सात ते आठ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंबेघरमार्गे ...

कुडाळ : नांदगणे ते पुनवडीदरम्यानचा पूल वाहून गेल्याने सात ते आठ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंबेघरमार्गे वळसा मारून यावे लागत आहे. महिना होऊनही या पुलाचे काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अतिवृष्टीने नांदगणे-पुनवडीदरम्यानचा पूल वाहून गेला होता. त्या घटनेला आता महिना उलटून गेला तरी अजूनही काम सुरू झाले नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदींनी भेट देऊन पाहणी केली होती. हा पूल वाहतुकीस बंद असल्याने केडंबे, तळोशी, वाळंजवाडी, बाहुले, भुतेकर, बोंडारवाडी येथील ग्रामस्थांना डांगरेघर-आंबेघरमार्गे यावे लागत आहे.

बंदोबस्ताची मागणी

0000000

भटक्या कुत्र्यांमुळे उपद्रव

खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

०००००००

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात वाढ

सातारा : सातारा पालिकेने कारवाई करूनही शहरातील हातगाडीधारकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. शहरातील राजवाडा, खणआळी, मोती चौक, देवी चौक, पाचशे एक पाटी, जुना मोटर स्टॅंड परिसरातील अनेक हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू लागले आहेत. पालिकेची दंडात्मक मोहीम थंडावल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.

००००००

सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने प्रश्न

सातारा : गरिबांचा आधारवड असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागास याबाबत पत्रव्यवहार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

------

पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज

सातारा : शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता, होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांची आवश्यकता आहे. नागरिकांतून वारंवार याबाबत मागणी होत आहे. मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.