शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

तुमच्या लाडक्या चेतकमुळेच आम्ही तळ्याबाबत पत्र दिले: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:16 IST

सातारा : सन २०१५ रोजी टंचाईची परिस्थिती होती, कित्येक वर्षे तळ्याची स्वच्छता करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यातच तळ्यावरच्या तुमच्या लाडक्या चेतकने जलमंदिरच्या चौथऱ्यावर येऊन पत्राची मागणी केल्याने आम्ही ते पत्र दिले आहे. आमच्या पत्रामुळे तळ्यातील विसर्जनास बंदी घातली नसून, उच्च न्यायालयात तुमच्या दोन ...

सातारा : सन २०१५ रोजी टंचाईची परिस्थिती होती, कित्येक वर्षे तळ्याची स्वच्छता करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यातच तळ्यावरच्या तुमच्या लाडक्या चेतकने जलमंदिरच्या चौथऱ्यावर येऊन पत्राची मागणी केल्याने आम्ही ते पत्र दिले आहे. आमच्या पत्रामुळे तळ्यातील विसर्जनास बंदी घातली नसून, उच्च न्यायालयात तुमच्या दोन चमको नगरसेवकांनी सभेच्या मंजुरीशिवाय तत्कालीन मुख्याधिकाºयांना प्रतिज्ञापत्र द्यायला भाग पाडल्यानेच बंदी घातली आहे. याचे आत्मचिंतन करून आमदारांनी आपल्या मर्यादा लक्षात घेऊन बेताल आरोप करावेत, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘आमचे पत्र दिल्याने जर विसर्जन तळ्यावर बंदी घातली असेल तर आम्ही दिलेल्या ना हरकतीच्या पत्राने ती बंदी उठली पाहिजे; पण तसे जिल्हा प्रशासन करीत नाही, याचाच अर्थ आम्ही पत्र दिल्याने बंदी घातली गेली नाही तर ती बंदी उच्च न्यायालयातील तत्कालीन मुख्याधिकाºयांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे घातली गेली आहे, हे आमदारांना समजलेले नाही. आम्ही मंगळवार तळ्यावर विसर्जनास परवानगी देण्याबाबतचे दि. ७ रोजी पत्र दिले आहे, त्या पत्रात २०१५ मध्ये दिलेल्या पत्राचा उल्लेख केलेला आहे. डीजेबाबत बंदी नसावी, असे आम्ही परखडपणे मांडले तर शेवटचे दोन दिवस डीजेला परवानगी द्यावी, असे नुकतेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी म्हणणे मांडले आहे. शिवेंद्रसिंहराजे बोलले म्हणजे ती मागणी झाली आणि आम्ही सामान्यांचे मत मांडले की तो स्टंट झाला. आम्ही स्टंटबाज तर तुम्ही स्पॉटबॉय का? असा घणाघातही खा. उदयनराजे यांनी केला.गणेशभक्तांची आम्ही माफी मागून मंगळवार तळे विसर्जनास खुले होणार असेल तर आम्ही केव्हाही माफी मागण्यास तयार आहोत. तथापि तुमच्या बँका आणि संस्थांमधील प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले त्याबद्दल तुम्ही गांधी मैदानावर तुमचे नाक घासणारका? आम्ही घेतलेल्या कणखर भूमिकेमुळेच प्रशासनाने, जिल्हा परिषदेच्या शेती शाळेतीलजागेत कृत्रिम तळे काढण्यास सुरुवात केली आहे. नाही तर गणेशभक्तांना कण्हेर तलावाच्या खाणीत विसर्जनासाठी जावे लागलेअसते. जिल्हा परिषदेला शेती शाळेतील जागा न देण्याविषयी कुणाचा दबाव होता, हे आता लपून राहिलेले नाही.दाढ्या वाढवूनअकलेत वाढ होत नसते...आम्ही आजपर्यंत आत एक आणि बाहेर एक, अशी कधीही भूमिका मांडलेली नाही. दिवंगत दादामहाराज यांच्यापासून आम्ही जनतेबरोबर आहोत आणि जनतेमध्येच आम्ही आमच्या कुटुंबाची स्वप्ने पाहत असतो. तुमच्यासारखे सहकाराखाली संस्था काढून कुणाला देशोधडीला तरी आम्ही लावलेले नाही. दाढ्या वाढवून अकलेत वाढ होत नसते. त्यासाठी आडात असावे लागते. स्वत:ची ठाम भूमिका आणि पकड असावी लागते, तुम्ही कुणाची करंगळी धरून तुमचे राजकारण करीत आहात, हे सामान्य जनतेलाही माहिती आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधीची जबाबदारी सांगू नका, तुमच्या पायरीने तुम्ही राहा, असा खरमरीत इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.