शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

पावसामुळे ओढे कचऱ्याने तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST

पावसामुळे ओढे कचऱ्याने तुडुंब सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील ओढे-नाले कचऱ्याने तुडुंब ...

पावसामुळे ओढे कचऱ्याने तुडुंब

सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील ओढे-नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात कचरा वाहत आल्याने पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे ओढे-नाल्यांमधील पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी दिवसभर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोडोली, गोडोली या भागातही पालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन

सातारा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी १ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत सर्वप्रकारच्या अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, किराणा व भाजीपाला घरपोच उपलब्ध करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, यासाठीही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. असे असले तरी बहुतांश दुकानदार सकाळी अकरानंतर दुकानाचे शटर बंद करून व्यवसाय करत आहेत. काही दुकाने तर पाठीमागच्या बाजूने सुरू ठेवली जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही दुकानदारांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही.

वाहनधारकांची फरपट सुरूच

सातारा : मोळाचा ओढा ते कोंडवे या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अर्धा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहनधारकांची ये-जा सुरू असते. रात्रीच्या वेळी खोदण्यात आलेला रस्ता व रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांच्या नजरेस पडत नसल्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

कास तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ

पेट्री : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. या तलावातून सातारा शहराला दररोज साडेपाच लाख लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तलावाची पातळी दररोज एक इंचाने कमी होते. काही दिवसांपूर्वी तलावात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक होता. त्यामध्ये हळूहळू वाढ होऊ लागल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.