शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कमी पाण्याअभावी शिवारं पडली ओस..

By admin | Updated: April 20, 2017 22:41 IST

कमी पाण्याअभावी शिवारं पडली ओस..

कुकुडवाड : सध्या माण तालुक्यातील जनतेला दुष्काळ तसा काही नवीन नाही. अशा दुष्काळाच्या वाईट परिस्थितीमध्ये दुष्काळाबरोबर सतत झुंज देण्याची ताकद या माणवासीय जनतेत आहे. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या शिवारातील मागील पिकाची काढणी झाल्यापासून तसेच भीषण पाणी टंचाईमुळे व जमिनीतील भूजल पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यातील वडजल, ता. माण पंचक्रोशी व परिसरातील शेतकऱ्यांची शेतीची शिवारं पाण्याअभावी ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.माण तालुक्यात सतत दरवर्षी दुष्काळ पाचवीला पूजलेला असतो. तालुक्याच्या अग्नेय बाजूस असणाऱ्या वडजल गावच्या पंचकृषीतील व परिसरातील पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे वडजल येथील जनतेला पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण बनला आहे. अशी पाण्याची भीषण टंचाई, खालावलेली भूजल पातळी, लोकांची पाण्यासाठी वणवण, विहिरींनी गाठलेला तळ, बंद झालेल्या कूपनालिका, यामुळे लोकांना पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. असे असताना शेतीला कुठून पाणी आणायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे वडजल परिसरातील शेतीची सर्रास शिवारं ओस पडलेली आहेत. अशा टंचाईमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये सध्या कोणतेही पीक नाही. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे सध्या शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतात शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. पीक घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे दुष्काळाबरोबर पाण्याविना दरडोई आर्थिक उत्पन्नामध्ये घट होत असल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही. त्यामुळे सध्या शेतकरी येणाऱ्या पावसाची वाट पाहत बसला आहे. याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याकडे पावसाची वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. (वार्ताहर)