शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कमी पाण्याअभावी शिवारं पडली ओस..

By admin | Updated: April 20, 2017 22:41 IST

कमी पाण्याअभावी शिवारं पडली ओस..

कुकुडवाड : सध्या माण तालुक्यातील जनतेला दुष्काळ तसा काही नवीन नाही. अशा दुष्काळाच्या वाईट परिस्थितीमध्ये दुष्काळाबरोबर सतत झुंज देण्याची ताकद या माणवासीय जनतेत आहे. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या शिवारातील मागील पिकाची काढणी झाल्यापासून तसेच भीषण पाणी टंचाईमुळे व जमिनीतील भूजल पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यातील वडजल, ता. माण पंचक्रोशी व परिसरातील शेतकऱ्यांची शेतीची शिवारं पाण्याअभावी ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.माण तालुक्यात सतत दरवर्षी दुष्काळ पाचवीला पूजलेला असतो. तालुक्याच्या अग्नेय बाजूस असणाऱ्या वडजल गावच्या पंचकृषीतील व परिसरातील पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे वडजल येथील जनतेला पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण बनला आहे. अशी पाण्याची भीषण टंचाई, खालावलेली भूजल पातळी, लोकांची पाण्यासाठी वणवण, विहिरींनी गाठलेला तळ, बंद झालेल्या कूपनालिका, यामुळे लोकांना पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. असे असताना शेतीला कुठून पाणी आणायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे वडजल परिसरातील शेतीची सर्रास शिवारं ओस पडलेली आहेत. अशा टंचाईमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये सध्या कोणतेही पीक नाही. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे सध्या शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतात शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. पीक घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे दुष्काळाबरोबर पाण्याविना दरडोई आर्थिक उत्पन्नामध्ये घट होत असल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही. त्यामुळे सध्या शेतकरी येणाऱ्या पावसाची वाट पाहत बसला आहे. याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याकडे पावसाची वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. (वार्ताहर)