शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाईत अतिवृष्टीमुळे गाढवेवाडी पुलाला भगदाड, नांदगणे पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

वाई वाईच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत ...

वाई

वाईच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत गाढवेवाडी पुलाला भगदाड पडले असून नांदगणे पूल वाहून गेला आहे.

धोम धारणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन तो ६३. १८ टक्के झाला आहे. धरणाच्या खालील क्षेत्रातील ओढ्यांच्या पाण्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे.

बुधवारी दि. २१ जुलै\च्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने बलकवडी- नांदगणे-फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध, भाताची रोपे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टी झाल्यानंतर त्या ओढ्याला येणाऱ्या पाण्याचा जलस्त्रोत मोठा असल्याने पाणी परिसरातील शेतात घुसले. यामुळे उभ्या पिकाचे तसेच शेताचे बांध, ताली पडल्यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता रस्ता करतेवेळी संभाव्य धोका शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिला होता. पण त्यावेळेस तांत्रिक कारण पुढे करत पूल बांधण्यात आला. यामुळे गेली तीन वर्षे ओढा शेतात घुसून पुरामुळे शेतीचे नुकसान होत आहे. प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता यावर कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकट

वास्तविक पाहता रस्ता तयार करताना आम्ही त्यांना संभाव्य धोका सांगितला होता. पण त्यावेळेस आमच्या मताकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी अतिवृष्टी झाली की पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात शिरल्याने पिकाचे व शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, तरी संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतकऱ्याचे होणारे नुकसान थांबवावे.

राहुल भिलारे, स्थानिक नागरिक