शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाईत अतिवृष्टीमुळे गाढवेवाडी पुलाला भगदाड, नांदगणे पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

वाई वाईच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत ...

वाई

वाईच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत गाढवेवाडी पुलाला भगदाड पडले असून नांदगणे पूल वाहून गेला आहे.

धोम धारणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन तो ६३. १८ टक्के झाला आहे. धरणाच्या खालील क्षेत्रातील ओढ्यांच्या पाण्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे.

बुधवारी दि. २१ जुलै\च्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने बलकवडी- नांदगणे-फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध, भाताची रोपे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टी झाल्यानंतर त्या ओढ्याला येणाऱ्या पाण्याचा जलस्त्रोत मोठा असल्याने पाणी परिसरातील शेतात घुसले. यामुळे उभ्या पिकाचे तसेच शेताचे बांध, ताली पडल्यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता रस्ता करतेवेळी संभाव्य धोका शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिला होता. पण त्यावेळेस तांत्रिक कारण पुढे करत पूल बांधण्यात आला. यामुळे गेली तीन वर्षे ओढा शेतात घुसून पुरामुळे शेतीचे नुकसान होत आहे. प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता यावर कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकट

वास्तविक पाहता रस्ता तयार करताना आम्ही त्यांना संभाव्य धोका सांगितला होता. पण त्यावेळेस आमच्या मताकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी अतिवृष्टी झाली की पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात शिरल्याने पिकाचे व शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, तरी संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतकऱ्याचे होणारे नुकसान थांबवावे.

राहुल भिलारे, स्थानिक नागरिक