शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

दमदार पाऊस पडल्याने बळीराजाही सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीनंतर आता वाईच्या पश्चिम भागात भातपिकाच्या लावणीला वेग आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पाऊस पडत असल्याने भाताच्या बियाण्याचे तरवे जोमात आहेत. त्यांची चांगली वाढ झाली आहे. पश्चिम भागातील जांभळी, जोर खोर, बोरगाव, चिखली, अभेपुरी परिसरात लावणीची लगबग सुरु झाली आहे. वाईचा पश्चिम भाग हा विविध जातीचे भात उत्पादन करणारा भाग आहे. बासमतीसारख्या भाताची लागवड येथे मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या वाईच्या पश्चिम भागात भात लागवडीसाठी पूरक वातावरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भाताच्या विविध प्रजातींमध्ये ३७० बासमती, चंडीगड बासमती, पुसा बासमती, दिल्ली राईस, वरंगळ, इंद्रायणी, इंडो अमेरिका, कोलन, काळी कुसळी यांचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी दिली.

पश्चिम भागासह वाई तालुक्यात तीन हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. सध्या पावसाने दमदार सुरुवात केली आहे. हे वातावरण भाताच्या पिकाला पूरक आहे. ग्रामीण भागात सध्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतीची मशागत करण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी यंत्रावर अवलंबून राहावे लागत आहे.

उशिरा का होईना निसर्गराजा बरसल्याने या भागात सध्या कोकणी गाणी ऐकायला मिळत आहेत. अतिशय मोहक व सुंदर निसर्गरम्य परिसर ही या भागाची देण असल्याने काम करण्याचा हुरूप व्दिगुणित होतो. या भागातील शेतकरी वारंगुळा करत असल्याने रोजगाराची कमतरता भासत नाही. संपूर्ण परिसरातील शेतकरी भाताच्या लागवणीत मग्न आहेत.

चौकट

यंत्राच्या सहाय्याने केलेली भात लागण ही कमी वेळात होत असल्याने यंत्रानाही मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बैल जोडीचा, खते, बियाण्यांचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या वाईच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

१०वाई-अॅग्री,०१

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा पाऊस चांगला पडल्याने भात लावणीला वेग आला आहे.