शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

अवकाळीमुळं ज्वारी भुईसपाट, सातारा जिल्ह्यात नुकसान : द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:51 AM

सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे या पावसाचा काहींना लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीची पिके मात्र या वादळी पाऊसाने भुईसपाट केलीअगोदर सोयाबीन, घेवडा पीक दराअभावी धोक्यात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला

सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ज्वारीचे उभे पिक भुईसपाट झाले.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी भागात सोनके, करंजखोप, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, देऊर, तडवळे (संमत) वाघोली या गावांत गेली दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा काहींना लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीची पिके मात्र या वादळी पाऊसाने भुईसपाट केली आहेत.

अगोदर सोयाबीन, घेवडा पीक दराअभावी धोक्यात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, यातच हाता तोंडाला आलेली ज्वारी ही भुईसपाट झाल्याने ज्वारीचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. शासनाने याबाबत नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांमधून जोर धरू लागली आहेबागायतदार पावसाने अडचणीतकलेढोण परिसरातील विखळे, पाचवड, गारळेवाडी व गारुडी भागामध्ये हजारो एकर द्राक्ष बागांचे क्षेत्र आहे. बुधवारी सायंकाळी या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाच्या सरी पडल्या त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षांचे मनी धरण्याची स्टेज आहे. तर काही बागांमध्ये मनी धरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशावेळी हा पाऊस झाल्यामुळे द्राक्ष पिकाबरोबरच द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत.कलेढोण भागाला पावसाचा तडाखाकलेढोण, ता. खटाव परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, या पावसामुळे मनी धरण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्ष पिकाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पावसामुळे दावण्या व भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

 

या अवकाळी पावसामुळे द्र्राक्षावर परिणाम होणार आहे. दावण्या व भुरीचा रोग होण्याचे वातावरण या अवकाळीने निर्माण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले द्राक्ष पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.- कृष्णा शिंदे, द्राक्ष बागायतदार, कलेढोणतडवळे (संमत)वाघोली गावात काल झालेल्या मुसळधार पावसाने ज्वारी पीक भुईसपाट झाले आहे. याबाबत शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून कृषी विभागाने ज्वारीच्या पिकाचे पंचनामे करून शासनाला सादर करावेत.- कमलाकर भोईटे, तडवळे