शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अवकाळीमुळं ज्वारी भुईसपाट, सातारा जिल्ह्यात नुकसान : द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:57 IST

सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे या पावसाचा काहींना लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीची पिके मात्र या वादळी पाऊसाने भुईसपाट केलीअगोदर सोयाबीन, घेवडा पीक दराअभावी धोक्यात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला

सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ज्वारीचे उभे पिक भुईसपाट झाले.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी भागात सोनके, करंजखोप, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, देऊर, तडवळे (संमत) वाघोली या गावांत गेली दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा काहींना लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीची पिके मात्र या वादळी पाऊसाने भुईसपाट केली आहेत.

अगोदर सोयाबीन, घेवडा पीक दराअभावी धोक्यात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, यातच हाता तोंडाला आलेली ज्वारी ही भुईसपाट झाल्याने ज्वारीचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. शासनाने याबाबत नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांमधून जोर धरू लागली आहेबागायतदार पावसाने अडचणीतकलेढोण परिसरातील विखळे, पाचवड, गारळेवाडी व गारुडी भागामध्ये हजारो एकर द्राक्ष बागांचे क्षेत्र आहे. बुधवारी सायंकाळी या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाच्या सरी पडल्या त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षांचे मनी धरण्याची स्टेज आहे. तर काही बागांमध्ये मनी धरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशावेळी हा पाऊस झाल्यामुळे द्राक्ष पिकाबरोबरच द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत.कलेढोण भागाला पावसाचा तडाखाकलेढोण, ता. खटाव परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, या पावसामुळे मनी धरण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्ष पिकाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पावसामुळे दावण्या व भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

 

या अवकाळी पावसामुळे द्र्राक्षावर परिणाम होणार आहे. दावण्या व भुरीचा रोग होण्याचे वातावरण या अवकाळीने निर्माण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले द्राक्ष पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.- कृष्णा शिंदे, द्राक्ष बागायतदार, कलेढोणतडवळे (संमत)वाघोली गावात काल झालेल्या मुसळधार पावसाने ज्वारी पीक भुईसपाट झाले आहे. याबाबत शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून कृषी विभागाने ज्वारीच्या पिकाचे पंचनामे करून शासनाला सादर करावेत.- कमलाकर भोईटे, तडवळे