शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले -बळीराजाचे डोळे आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:54 IST

गेले काही दिवस वातावरणात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानाचा द्र्राक्ष बागांवर प्रतिकुल परिणाम होत आहे.

ठळक मुद्देकडाक्याच्या थंडीने आकार बारीक त्यातच पाऊस झाल्यास मणी गळण्याचा धोका

पिंपोडे बुद्रुक : गेले काही दिवस वातावरणात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानाचा द्र्राक्ष बागांवर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेले काही दिवसांपासून परिसरातील वातावरणात कडाक्याची थंडी कायम असताना दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे वाघोली, सर्कलवाडी, चौधरवाडी,  सोनके येथील द्राक्ष बागांवर झाला आहे. परिसरातील द्राक्षे पीक फळ वाढीच्या आवस्थेत असून थंडीमुळे फळाच्या आकारात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यासाठी शेतकºयांनी विविध प्रयत्न करत त्या परिस्थितीवर मात केली. परंतु अलीकडील दोन दिवसांपासूनच्या ढगाळ हवामानामुळे पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. पाणीटंचाई काळात द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी पाण्यावर पैसे खर्च करून द्राक्षे पीक जोपासले आहे. यावर्षी फळ धारणाही चांगली असताना वातावरणात निर्माण होणारी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.    

प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीत द्राक्ष पीक रोगाला लवकर बळी पडत असल्याने मुळात द्राक्ष पिकाचा उत्पादन खर्च जास्त असतो. यावर्षी पाणीटंचाई मुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असतानाच नवे संकट उभे राहिले आहे.- राहुल धुमाळ संचालक, विकास सेवा सोसायटी.