शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पावसाअभावी भात पिकाचे उत्पन्न घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 00:21 IST

पाटण तालुका : चिखलणीसाठी पाणीसाठाच नाही

मल्हारपेठ : ऐन पावसाळ्यातील जून महिना संपला तरी भात रोपांची लागण करण्याइतपत पुरेसा पाऊस पडत नाही. तसेच भात लागणीच्या चिखलणीसाठी पाणीसाठा नसल्याने पाटण तालुक्यातील भात लागणी खोळंबल्या आहेत. यावरून यावर्षाचे भात पिकाचे उत्पन्न घटणार असे दिसू लागले आहे.आजपर्यंतच्या खरीप हंगामास पाटण तालुक्यातील कोयनानगर, पाटण विभाग भातशेतीच्या लागणी आघाडीवर असायच्या; परंतु या वर्षीच्या खरीप हंगामात एक तर उशिरा पावसाला सुरुवात झाली आणि एका आठवड्यातच उघडीप दिली. या दरम्यान इतर विभागात पेरण्या होत आल्या; परंतु भात रोपांची तरवे तयार होऊनही वाफा पद्धतीने चिखल करून भात लागणीस पुरेसा पाऊस व पाणी उपलब्ध नसल्याने लागणीची कामे रखडली आहेत. जुलै महिन्यात पुरेसा पाऊस नाही पडला तर भाताचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.भात पिकासाठी जास्त पावसाची गरज आहे. पाटण तालुक्यात ६७५०९ हेक्टर जमीन क्षेत्र असून, ३८ हजार हेक्टरवर पेरण्या होत आल्या असून, त्यामध्ये भात पेरणी ५४७५ हेक्टरवर झाली व ६८४ वर भात तरू टाकले, ज्वारी पेरणी ७८४७ हेक्टर, मका ४७६, नाचणी १३७, हे. वरी १०५, आंतरपीक तूर ४२४, मूग १५६, उडीद ३१२, पावटा २१० हेक्टर, घेवडा १७०, चवळी १९०, मटकी २६, भुईमूग ८९५७, सोयाबीन ७४०५, कारळा १८८, चारापीक १२२, भाजीपाला १२९, मसाला पीक ६२ हेक्टर व उसाचे क्षेत्र ४९८० हेक्टर अशी २२ जून रोजीपर्यंतच्या पीकपाणी व पेरणीची माहिती उपलब्ध झाली आहे. यंदा एकुण ३८ हजार हेक्टर पिकाची लागवड झाली आहे. (वार्ताहर)