शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

कोरड्या येरळेला फुटणार मायेचा उमाळा!

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

पुनरुज्जीवनास प्रारंभ : प्रशासनासह सेवागिरी देवस्थान ट्रस्टचा पुढाकार; संत समाज आणि शासनाचे हातात हात

 पुसेगाव : येरळा नदी कायमस्वरूपी प्रवाही राहावी, यासाठी नदीच्या उगम स्थानापासून सिमेंट बंधारे, खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने येरळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.‘जलयुक्त शिवार’ अभियानाला धरून संत समाज आणि शासन यांच्या समन्वयातून येरळा नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमास याप्रसंगी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, उपजिल्हाधिकारी सानप, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, देवस्थान ट्रस्टचे डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, माजी देवस्थान टस्ट अध्यक्ष गुलाबराव वाघ, माजी सरपंच बाळासो जाधव, दिलीप बाचल, रूपेश कदम, देवस्थानचे सचिव अविनाश देशमुख व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘राष्ट्रीयस्तराचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत येरळा नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा व येरळा नदीचे खोलीकरण करण्याचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत घेण्यात आला होता. खटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याठिकाणी शाश्वत सिंचनाची सोय नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच येथील शेती व्यवसाय सुरू असतो. काही भागांमध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांपासून पाणीटंचाई सुरू असते. म्हणूनच येथील श्री सवोगिरी देवस्थान ट्रस्टने यापूर्वीच लोकसहभाग, सामाजिक संस्था व ट्रस्टने पुढाकार घेऊन ओढ्यावरती सिमेट बंधारे, पाझर तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढून जलसंधारणाची कामे केली आहे.संतसमाज आणि शासन यांच्या समन्वयातून हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून, म्हस्कोबा डोंगरातील येरळा नदीच्या उगमस्थानापासून मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, ललगुण, नागनाथवाडी, राजापूर काटकरवाडी व खातगुण, खटाव या येरळा नदीच्या काठच्या गावांतील ग्रामस्थांनी तसेच तरुण कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी गावोगावात कमिट्या स्थापन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी सानप यांनी मनोगत व्यक्तकेले. (वार्ताहर)पाणीटंचाई मिटणार!मांजरवाडी ते पुसेगाव येथे या योजनेतून येरळा नदीवर सिमेंट बंधारे बांधून अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. येरळा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर या नदीचे रुपडे पालटणार असून, खऱ्या अर्थाने नदीशेजारीच्या गावांची पिण्याची व शेतीच्या पाण्याची कायमची टंचाई दूर व्हावी, हा यामागील खरा उद्देश आहे.