शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

कोरडा रंग चेहऱ्यासाठी.. पिचकारी झाडांसाठी !

By admin | Updated: March 29, 2016 00:16 IST

साताऱ्यात ऐतिहासिक रंगपंचमी : ‘लोकमत’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद; बच्चे कंपनीलाही उमजले थेंब-थेंब पाण्याचे महत्त्व

सातारा : राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा दुुष्काळाशी चार हात करत असताना रंगपंचमीत होणारा पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘रंगोत्सव पाण्याच्या नासाडीविना’ या चळवळीस सातारकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सहभागी होत सातारकरांनी यंदाची रंगपंचमी कोरड्या रंगांचा वापर करून साजरी केली.पाण्याविना रंगपंचमी साजरी होऊच शकत नाही, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. या मानसिकतेमुळे रंगपंचमीत दरवर्षी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होतो. तरुणाई देखील पाण्यासह पैशांचा अपव्यय करून डॉल्बी सिस्टीमवर बेभान होऊन नाचताना दिसते. मात्र, यंदाच्या रंगपंचमीत अबालवृद्धांनी या सर्व गोष्टींना बगल देत पाण्याविना रंगपंचमी साजरी केली.सातारकरांनी पाण्याचा वापर न करता केवळ कोरड्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केला. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन इतरांना पाण्याचा वापर न करण्याचे आवाहनही केले. डीजेच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईने पाण्याचे महत्त्व ओळखून कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय व ग्रामपंचायतींनी ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत कोरडी रंगपंचमी खेळण्याची व पाणी बचतीची थपथ घेतली होती. त्यानुसार अनेकांनी आपली जलप्रतिज्ञा पूर्ण केली.‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनामुळे यंदा जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याची बचत झाली असून, दुष्काळी परिस्थितीत ‘लोकमत’ने केलेले हे कार्य ऐतिहासिक व कौतुकास्पद आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)निसर्गासंगे रंगपंचमीलहान मुले देखील एका छोट्या कृतीतून मोठी शिकवण देऊन जातात याची प्रचिती साताऱ्यात रंगपंचमीदिवशी अनुभवता आली. येथील काही मुलांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. तसेच पिचकारीमधून एकमेंकांच्या अंगावर रंग न उडविता चिमुकल्यांनी चक्क घराशेजारी असलेल्या वृक्षांना पाणी घातले. पाण्याविना वृक्षसंपदा धोक्यात आली असताना लहानग्यांनी दाखविलेल्या आपल्या कल्पनाशक्तीचे सर्वांनीच कौतुक केले.‘लोकमत’ने संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणीबचतीचा संदेश दिला. या मोहिमेस प्रतिसाद देत मायणीतील नागरिकांनी सार्वजनिक रंगपंचमीला पूर्णविराम दिला. - डॉ. एम. आर. देशमुखसंस्थापक, शिवाजी एज्युकेशन सोसायटी सार्वजनिक मंडळांकडूनही जनजागृती..‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा शहरातील जयहिंद व जय जवान या मंडळांनी ढोल-ताशे वाजवून कोरडी रंगपंचमी साजरी केली. तसेच ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती केली.