शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरडा रंग चेहऱ्यासाठी.. पिचकारी झाडांसाठी !

By admin | Updated: March 29, 2016 00:16 IST

साताऱ्यात ऐतिहासिक रंगपंचमी : ‘लोकमत’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद; बच्चे कंपनीलाही उमजले थेंब-थेंब पाण्याचे महत्त्व

सातारा : राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा दुुष्काळाशी चार हात करत असताना रंगपंचमीत होणारा पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘रंगोत्सव पाण्याच्या नासाडीविना’ या चळवळीस सातारकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सहभागी होत सातारकरांनी यंदाची रंगपंचमी कोरड्या रंगांचा वापर करून साजरी केली.पाण्याविना रंगपंचमी साजरी होऊच शकत नाही, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. या मानसिकतेमुळे रंगपंचमीत दरवर्षी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होतो. तरुणाई देखील पाण्यासह पैशांचा अपव्यय करून डॉल्बी सिस्टीमवर बेभान होऊन नाचताना दिसते. मात्र, यंदाच्या रंगपंचमीत अबालवृद्धांनी या सर्व गोष्टींना बगल देत पाण्याविना रंगपंचमी साजरी केली.सातारकरांनी पाण्याचा वापर न करता केवळ कोरड्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केला. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन इतरांना पाण्याचा वापर न करण्याचे आवाहनही केले. डीजेच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईने पाण्याचे महत्त्व ओळखून कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय व ग्रामपंचायतींनी ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत कोरडी रंगपंचमी खेळण्याची व पाणी बचतीची थपथ घेतली होती. त्यानुसार अनेकांनी आपली जलप्रतिज्ञा पूर्ण केली.‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनामुळे यंदा जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याची बचत झाली असून, दुष्काळी परिस्थितीत ‘लोकमत’ने केलेले हे कार्य ऐतिहासिक व कौतुकास्पद आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)निसर्गासंगे रंगपंचमीलहान मुले देखील एका छोट्या कृतीतून मोठी शिकवण देऊन जातात याची प्रचिती साताऱ्यात रंगपंचमीदिवशी अनुभवता आली. येथील काही मुलांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. तसेच पिचकारीमधून एकमेंकांच्या अंगावर रंग न उडविता चिमुकल्यांनी चक्क घराशेजारी असलेल्या वृक्षांना पाणी घातले. पाण्याविना वृक्षसंपदा धोक्यात आली असताना लहानग्यांनी दाखविलेल्या आपल्या कल्पनाशक्तीचे सर्वांनीच कौतुक केले.‘लोकमत’ने संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणीबचतीचा संदेश दिला. या मोहिमेस प्रतिसाद देत मायणीतील नागरिकांनी सार्वजनिक रंगपंचमीला पूर्णविराम दिला. - डॉ. एम. आर. देशमुखसंस्थापक, शिवाजी एज्युकेशन सोसायटी सार्वजनिक मंडळांकडूनही जनजागृती..‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा शहरातील जयहिंद व जय जवान या मंडळांनी ढोल-ताशे वाजवून कोरडी रंगपंचमी साजरी केली. तसेच ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती केली.