शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरडा रंग चेहऱ्यासाठी.. पिचकारी झाडांसाठी !

By admin | Updated: March 29, 2016 00:16 IST

साताऱ्यात ऐतिहासिक रंगपंचमी : ‘लोकमत’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद; बच्चे कंपनीलाही उमजले थेंब-थेंब पाण्याचे महत्त्व

सातारा : राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा दुुष्काळाशी चार हात करत असताना रंगपंचमीत होणारा पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘रंगोत्सव पाण्याच्या नासाडीविना’ या चळवळीस सातारकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सहभागी होत सातारकरांनी यंदाची रंगपंचमी कोरड्या रंगांचा वापर करून साजरी केली.पाण्याविना रंगपंचमी साजरी होऊच शकत नाही, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. या मानसिकतेमुळे रंगपंचमीत दरवर्षी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होतो. तरुणाई देखील पाण्यासह पैशांचा अपव्यय करून डॉल्बी सिस्टीमवर बेभान होऊन नाचताना दिसते. मात्र, यंदाच्या रंगपंचमीत अबालवृद्धांनी या सर्व गोष्टींना बगल देत पाण्याविना रंगपंचमी साजरी केली.सातारकरांनी पाण्याचा वापर न करता केवळ कोरड्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केला. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन इतरांना पाण्याचा वापर न करण्याचे आवाहनही केले. डीजेच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईने पाण्याचे महत्त्व ओळखून कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय व ग्रामपंचायतींनी ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत कोरडी रंगपंचमी खेळण्याची व पाणी बचतीची थपथ घेतली होती. त्यानुसार अनेकांनी आपली जलप्रतिज्ञा पूर्ण केली.‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनामुळे यंदा जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याची बचत झाली असून, दुष्काळी परिस्थितीत ‘लोकमत’ने केलेले हे कार्य ऐतिहासिक व कौतुकास्पद आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)निसर्गासंगे रंगपंचमीलहान मुले देखील एका छोट्या कृतीतून मोठी शिकवण देऊन जातात याची प्रचिती साताऱ्यात रंगपंचमीदिवशी अनुभवता आली. येथील काही मुलांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली. तसेच पिचकारीमधून एकमेंकांच्या अंगावर रंग न उडविता चिमुकल्यांनी चक्क घराशेजारी असलेल्या वृक्षांना पाणी घातले. पाण्याविना वृक्षसंपदा धोक्यात आली असताना लहानग्यांनी दाखविलेल्या आपल्या कल्पनाशक्तीचे सर्वांनीच कौतुक केले.‘लोकमत’ने संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणीबचतीचा संदेश दिला. या मोहिमेस प्रतिसाद देत मायणीतील नागरिकांनी सार्वजनिक रंगपंचमीला पूर्णविराम दिला. - डॉ. एम. आर. देशमुखसंस्थापक, शिवाजी एज्युकेशन सोसायटी सार्वजनिक मंडळांकडूनही जनजागृती..‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा शहरातील जयहिंद व जय जवान या मंडळांनी ढोल-ताशे वाजवून कोरडी रंगपंचमी साजरी केली. तसेच ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती केली.