शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावरच्या झाडांना सलाईनद्वारे टाकाऊ बाटलीतून थेंब-थेंब पाणी.. गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:22 IST

उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी

अजय जाधव ।उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी याला अपवाद ठरले. तेथील युवकांनी भैरवनाथ देवस्थानच्या एक एकर जमिनीवर लावलेले शेकडो झाडे-फुलझाडे जगवण्यासाठी पाण्याच्या बाटल्यांचे सलाईन लावले आहे.

साखरवाडी हे कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेले गाव. गावाची लोकसंख्या अवघी चारशेच्या घरात. त्यातील निम्मे लोक उपजीविकेसाठी बाहेरगावी राहतात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे हे गाव दळणवळणाच्या सुखसोयीपासून लांब राहिले आहे. विधायक कामाच्या पाठीमागे सर्व ताकदीसह एकसंघ राहणारे गाव. गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीत हिरवाई फुलवावी. या कल्पनेतून ग्रामस्थ, युवक-युवतींनी निर्धार केला. उजाड माळरानावर गेल्या वर्षी वेगवेगळ्या जातींची झाडे, फुलझाडे लावली होती.

यामध्ये पिंपळ, वड, आंबा, चिंच, चिकू, लिंब, चंदन, बेल, सीताफळ, फायकस, बोगनवेल, आकाशी, चाफा, बकुळा यांची रोपे लावली. रोपे लावून समाधान न मानता ते जगविण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे.पावसाळ्यात पाण्याची कमतरता नसते; पण उन्हाळा सुरू झाला की येथे पाणी-पाणी करण्याची वेळ येते. पाण्याची कमतरता असूनही ही झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थ गाडीतून पाणी आणून या झाडांना देतात. असे पाणी आणणे, देणे हे खूप कष्टदायी आहे. हे युवकांच्या लक्षात आले. त्यांनी टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्या.

रिकाम्या बाटलीत पाणी भरले. या बाटल्याना छोटी छिद्रे पाडली. त्यानी या बाटल्या झाडांना अडकवल्या. त्यातून थेंब थेंब पडणारे पाणी ठिबकू लागले. हे पाणी झाडांच्या मुळापर्यंत पोहोचू लागले. गारवा निर्माण झाला. ही संकल्पना चोरे येथील गणेश गुरव, विजय भोसले, शुभम साळुंखे यांच्यासह युवकांनी राबवली आहे. ही झाडे बहरली उजाड डोंगरावर सावली निर्माण होईल.युवकांनी घेतली जबाबदारी...पाणी देण्याच्या या सलाईनच्या प्रकाराने झाडांना पाणी हळूहळू मिळत आहे. बाटलीमधील पाणी संपले तर बाटलीचे झाकण काढून पुन्हा पाणी भरले जात आहे. ही जबाबदारी युवकांनी घेतली आहे. रिकाम्या टाकाऊ पाण्याच्या बाटलीच्या माध्यमातून झाडे जगतील.ऱ्हाड तालुक्यातील साखरवाडीच्या डोंगरावर गेल्यावर्षी लावलेली झाडे जगविण्यासाठी सलाईनच्या बाटल्या बांधण्यात आल्या आहेत.