शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

डोंगरावरच्या झाडांना सलाईनद्वारे टाकाऊ बाटलीतून थेंब-थेंब पाणी.. गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:22 IST

उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी

अजय जाधव ।उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी याला अपवाद ठरले. तेथील युवकांनी भैरवनाथ देवस्थानच्या एक एकर जमिनीवर लावलेले शेकडो झाडे-फुलझाडे जगवण्यासाठी पाण्याच्या बाटल्यांचे सलाईन लावले आहे.

साखरवाडी हे कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेले गाव. गावाची लोकसंख्या अवघी चारशेच्या घरात. त्यातील निम्मे लोक उपजीविकेसाठी बाहेरगावी राहतात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे हे गाव दळणवळणाच्या सुखसोयीपासून लांब राहिले आहे. विधायक कामाच्या पाठीमागे सर्व ताकदीसह एकसंघ राहणारे गाव. गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीत हिरवाई फुलवावी. या कल्पनेतून ग्रामस्थ, युवक-युवतींनी निर्धार केला. उजाड माळरानावर गेल्या वर्षी वेगवेगळ्या जातींची झाडे, फुलझाडे लावली होती.

यामध्ये पिंपळ, वड, आंबा, चिंच, चिकू, लिंब, चंदन, बेल, सीताफळ, फायकस, बोगनवेल, आकाशी, चाफा, बकुळा यांची रोपे लावली. रोपे लावून समाधान न मानता ते जगविण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे.पावसाळ्यात पाण्याची कमतरता नसते; पण उन्हाळा सुरू झाला की येथे पाणी-पाणी करण्याची वेळ येते. पाण्याची कमतरता असूनही ही झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थ गाडीतून पाणी आणून या झाडांना देतात. असे पाणी आणणे, देणे हे खूप कष्टदायी आहे. हे युवकांच्या लक्षात आले. त्यांनी टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्या.

रिकाम्या बाटलीत पाणी भरले. या बाटल्याना छोटी छिद्रे पाडली. त्यानी या बाटल्या झाडांना अडकवल्या. त्यातून थेंब थेंब पडणारे पाणी ठिबकू लागले. हे पाणी झाडांच्या मुळापर्यंत पोहोचू लागले. गारवा निर्माण झाला. ही संकल्पना चोरे येथील गणेश गुरव, विजय भोसले, शुभम साळुंखे यांच्यासह युवकांनी राबवली आहे. ही झाडे बहरली उजाड डोंगरावर सावली निर्माण होईल.युवकांनी घेतली जबाबदारी...पाणी देण्याच्या या सलाईनच्या प्रकाराने झाडांना पाणी हळूहळू मिळत आहे. बाटलीमधील पाणी संपले तर बाटलीचे झाकण काढून पुन्हा पाणी भरले जात आहे. ही जबाबदारी युवकांनी घेतली आहे. रिकाम्या टाकाऊ पाण्याच्या बाटलीच्या माध्यमातून झाडे जगतील.ऱ्हाड तालुक्यातील साखरवाडीच्या डोंगरावर गेल्यावर्षी लावलेली झाडे जगविण्यासाठी सलाईनच्या बाटल्या बांधण्यात आल्या आहेत.