शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पावसाळ्यातच दुष्काळ; शेतमजूर घायकुतीला...

By admin | Updated: August 26, 2015 21:20 IST

हाताला काम मिळेना : शेतकरीही चिंतेत; अनेकजण बांधकामाच्या मजुरीवर

कोपर्डे हवेली : ऐन पावसाळ्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्येक घटकावर जाणवू लागला आहे. ऐन पावसाळ्यात जिरायती क्षेत्रातील पिके करपू लागली आहेत. तर बागायती क्षेत्रातील दुष्काळाची परिस्थिती पाहून शेतकरी हवालदिल झाला असून, ऐन कामाच्या हंगामामध्ये शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होत आहे. मजूर कामाच्या शोधात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जुलै आणि आॅगस्ट महिना पावसाचा म्हणून ओळखला जातो. पण या महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेल्या जिरायती क्षेत्रातील पिके करपू लागली असून, येत्या चार दिवसांत पाऊस नाही पडला तर हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. भुईमूग, घेवडा, सोयाबीन, हायब्रीड आदी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांचे शेंडे करपले आहेत. बागायती क्षेत्रामध्ये शेतीकाम करण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत असते; पण ऐन हंगामामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यात पाऊस पडेल की नाही, याविषयी शाश्वती नसल्यामुळे शेतात काम करण्यासाठी मजुरांचा खर्च वाचविण्यासाठी स्वत: काम करणे, भांगलणीचा खर्च वाचविण्यासाठी रासायनिक औषधांच्या फवारण्या घेणे आदी गोष्टींमध्ये वाढ केली आहे. तर पाऊस पडत नसल्यामुळे उसाची पाचट काढणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवेल, या भीतीने उसाच्या लागणी बंद केल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात काटकसर करण्यासाठी मजुरांच्या कामामध्ये कपात करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना काम नाही, असेच चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. बांधकाम व्यवसायामध्ये काम शोधण्यासाठी पुरुषमंडळी फिरत आहेत. तर अनेक ठिकाणची बांधकामाची कामे गतवर्षीच्या तुलनेत बंद आहेत. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम दिसू लागला आहे. हॉटेल, दुकानदार, पानपट्ट्या आदींना ग्राहक नसल्याने मोठा फटका बसला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेकजण दूध व्यवसाय करत आहेत. तर अनेकांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. वैरणीची टंचाई जाणवू लागल्याने शेळ्या तसेच म्हशींची विक्री सुरू आहे. (वार्ताहर) सर्वच घटकांवर परिणामशेतीत उत्पादीत होणाऱ्या माळव्याच्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात घट गावोगावच्या शेतमजुरांच्या हाताला कामच मिळत नाहीकऱ्हाड शहरासह मोठ्या गावांतील बाजारपेठेवर मंदीचे सावट पाण्याअभावी पिके वाळल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव जिरायती क्षेत्रासह बागायती क्षेत्रामधील विहिरी, बोअर यांची पाण्याची पातळी खालावली. पाण्याअभावी अनेक विहिरी कोरड्यासध्या दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. शेतामध्ये कामे नसल्याने हाताला काम नाही. अनेकजण मिळेल ते काम करून कुटुंब जगवित आहेत.- ज्ञानेश्वर काळे, शेतमजूर, कोपर्डे हवेली मी जिरायती भागातील शेतकरी आहे. सध्याच्या दुष्काळामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत. विहीर पाण्याअभावी कोरडी पडली आहे. पिके जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- आबाजी पोळ, शेतकरी, शामगाव