शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

दुष्काळी वसना नदीत खळाळले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:15 IST

आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भागची वरदायनी असलेली वसना नदीही वाहु लागली आहे. वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले.

ठळक मुद्देपरतीच्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला दिलासावसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले

वाठार स्टेशन, 2 : पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाडा असा नामोल्लेख केला जात असलेल्या कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भाग यंदाही अपुºया पावसामुळे अडचणीत सापडला होता. राज्यात सर्वदूर पाऊस पडत असताना या भागातील दुष्काळ मात्र हटत नव्हता. या भागची वरदायनी असलेली वसना नदीही गेल्या अनेक वर्षांपासूून वाहिली नसल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुष्काळी वसना नदी वाहु लागली आहे.  वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले.

 वसना नदी पुनर्भरण आराखडा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला.  तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या आराखडा निश्चित करत जलसंधारण मंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे  वसना नदी पुनर्भरणाबाबत चा अहवाल सादर केला. त्यानंतर वसना नदीपात्रातील सोळशी ते पळशी या  दरम्यान वसना नदीत २७ बंधाºयांना मंजुरी देण्यात आली. यासाठी १२ कोटी १५ लाखांच्या खर्चासही मान्यता मिळाली. या प्रमाणे वसना नदीपात्रात आजअखेर जवळपास २५ बंधारे पुर्णत्वास आले.

गेल्यावर्षी यातील काही बंधाºयात पाणीसाठा झाला होता. मात्र, हे पाणी काही दिवसातच आटुन गेल्यामुळे या भागाची दुष्काळी परस्थिती  कायम राहिली.एका बाजुने या भागात पाणीसाठा होण्यासाठी जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतू पावसाअभावी बंधारे, ओढे कोरडे पडले होते.

पावसाळा संपत आला तरी या भागातील सर्वच पाझर तलाव, नदी पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने  वसना नदीसह लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहु लगले आहेत.

नदीपात्रात सोळशी पासून पळशी पर्यंत असलेले सर्व केटी वेअर बंधारे ही ओसंडुन वाहू लागले आहेत. यामुळे नदी परिसरातील बहुतांशी गावांचा तात्पुरता का होईना पाणी प्रश्न मिटला आहे.जलयुक्त शिवार ही लोकचळवळ बनू लागली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी हे आभियान वरदान ठरले आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी अडविल्यामुळे भुजल पातळी वाढणार असून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.- मनोज अनपट,अनपटवडी